Inflation: १०, २०, ३० वर्षानंतर काय असेल १ कोटींची किंमत?

मुंबई: आजकाल प्रत्येकाला करोडपती बनायचे आहे. यामुळे लोकांनीही शेअर मार्केट तसेच स्टॉक्समध्ये गुंतवणूक करायला सुरूवात केली आहे. आजच्या काळात १ कोटी रूपये म्हणजे नक्कीच मोठी रक्कम आहे.


खासकरून रिटायरमेंटबाबत लोक विचार करतात की १ कोटीमुळे प्रत्येक लक्ष्य साधता येईल जसे घर खरेदी करणे, मुलांचे शिक्षण, अथवा त्यांच्या लग्नाचा खर्च इत्यादी. मात्र तुम्ही विचार केला आहे का की तुम्ही १०, २० अथवा ३० वर्षानंतर रिटायर व्हाल तेव्हा या १ कोटीची किंमत काय असेल.


महागाई वेळेसह पैशाची किंमत कमी करते. आज आपल्याला जी रक्कम मोठी वाटत आहे ती पुढे जाऊन तितकीच मोठी राहत नाही. गरजा पूर्ण करण्यासाठीही ही रक्कम पुरत नाही.



बचत कशी कमी करते महागाई?


आज तुमच्या खात्यात जर १ कोटी असतील तर ते तुम्हाला खूप वाटत असतील. मात्र तुमच्या भविष्यासाठीच्या खर्चांना ते तितके पुरेसे आहेत का? असे यासाठी कारण महागाईसोबत पैशांची किंमत कमी होत जाते.


जर आज एका कारची किंमत १० लाख रूपये आहे तर १५ वर्षानंतर याची किंमत जास्त असेल. विचार करा की १० अथवा १५ वर्षांपूर्वी तुम्ही किराणा सामान अथवा भाड्यासाठी किती रूपये खर्च करत होतात. तेव्हा ते खूप होते मात्र आता ती रक्कम तुम्हाला थोडी वाटू शकते.



१०, २०, ३० वर्षानंतर एक कोटीची किंमत


जर ६ टक्के महागाई दर मानला जर १० वर्षानंतर १ कोटी रूपयांची किंमत ५५.८४ लाख रूपये असेल. जर २० वर्षानंतर ६ टक्के महागाई दर मानला तर १ कोटी रूपयांची किंमत घटून ती ३१.१८ लाख रूपये होईल. तर ३० वर्षांनी १ कोटी रूपयाची किंमत आजच्या हिशेबाने १७.४१ लाख रूपये असेल.

Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही