Pune News : खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेदरम्यान वाहतुकीत बदल!

पुणे : पुरंदर तालुक्यातील जेजुरी (Jejuri) येथे २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेमुळे वाहतूक कोंडी (Traffic) टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी वाहतुकीत बदल करण्याचे आदेश दिले आहेत.


यात्रेच्या निमित्ताने २ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत पुणे-जेजुरी-बारामती महामार्गावर जड वाहने आणि इतर वाहतुकीस बंदी घालून अन्य पर्यायी मार्ग वापरण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुण्याकडे जाणारी जड वाहतूक पूर्णपणे बंद केली जाईल आणि नीरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुण्याकडे वळवली जाईल. पुण्याकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली जाईल.


बेलसर-कोथळे-नाझरे-सुपे-मोरगाव मार्गे बारामती, फलटण आणि साताराकडे वाहने वळवली जातील.२ सप्टेंबर रोजीच्या श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी वाहतुकीचे निर्बंध शिथिल राहतील. नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी