राणेंचा प्रहार : आदित्य ठाकरे, वैभव नाईक दोन तास लपून बसले; अखेर पोलिसांच्या गराड्यात पळून गेले

मालवण : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे राजकारण करून त्याचा राजकीय फायदा कसा होईल, या प्रयत्नात असलेल्या उबाठाचे आदित्य ठाकरे व वैभव नाईक (Aditya Thackeray, Vaibhav Naik) यांच्यावर राजकोट किल्ल्यावर तब्बल दोन तास लपून बसण्याची नामुष्की ओढवली. अखेर दोन तासांनंतर पोलिसांच्या गराड्यातून आदित्य ठाकरे, वैभव नाईकना राजकोट किल्ल्यावरून पळावे लागले.


दरम्यान, पेंग्विन पेंग्विन घोषणानी त्यांना सुन्न करून सोडले. अखेर दोन तासांनी पोलिसांच्या सुरक्षा गराड्यात त्यांनी कशीबशी आपली सुटका केली. किल्ले राजकोट येथे आलेल्या आदित्य ठाकरे, वैभव नाईक व त्यांच्या गटाने अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याठिकाणी उपस्थित भाजपा पदाधिकारी आक्रमक बनले. भाजपा नेते निलेश राणे व भाजपा पदाधिकारी यांचा आक्रमकपणा व रुद्रावतार पाहून आदित्य ठाकरे, वैभव नाईकांना लपून राहावे लागले. बाहेर पडण्याचा मार्गच बंद झाल्याची स्थिती निर्माण झाली. यावेळी काही ठाकरे गट पदाधिकाऱ्यांनी फटकारेही खाल्ले. अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्या अंगलट आला.



राणेंचा दरारा ठाकरे, नाईकांनी अनुभवला


वाद शांत करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. तर मालवण दौऱ्यावर असलेले आमदार जयंत पाटील त्याठिकाणी पोहचले. चर्चा झाली, मात्र सुरु असलेल्या घोषणाबाजी पाहता वाद पुन्हा वाढण्याची स्थिती निर्माण झाली. मात्र भाजपा पदाधिकारी, निलेश राणे यांनी संयम दाखवला. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात आदित्य ठाकरे, वैभव नाईक व अन्य पदाधिकारी ठिकाणाहुन पोलीस गराड्यात निघून गेले. यावेळी पेंग्विन पेंग्विन अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोलिसांनी कडे करून सर्वाना बाहेर आणले. एकूणच राणेंचा दरारा यावेळी आदित्य ठाकरे, वैभव नाईक यांनी अनुभवला.



जोरदार घोषणा


राणे साहेब अंगार है, बाकी सब भंगार है... राणे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है... हमारा नेता कैसा हो, राणे साहेब जैसा हो.... भारतीय जनता पार्टीचा, विजय असो.... यासह जोरदार घोषणाबाजी भाजपा पदाधिकारी यांनी केली.

Comments
Add Comment

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात

ताडोबातल्या तारा वाघीणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

संजय कपूरची ३० हजार कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार ? न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे येणार नवा ट्विस्ट ?

नवी दिल्ली : उद्योगपती संजय कपूरची ३० हजार कोटी रुपयांची मालमत्ता कोणाच्या मालकीची होणार असा प्रश्न निर्माण

उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी केलेले एक काम संजय राऊतांनी दाखवावे

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे थेट आव्हान उद्धव ठाकरे आणि उबाटा गट यांनी मराठी माणसाच्या हितासाठी काय

१६ जानेवारीला आपण अटलजींना खरी आदरांजली द्यायची आहे" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : आज संपूर्ण देशभरात अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या निमित्त भाजपा