Rain: वाहने-घरे पाण्यात, गुजरातचे रस्ते बनले नद्या, हवामान विभागाकडून रेड अलर्ट

गांधीनगर: गुजरातमध्ये पावसाने हाहाकार उडवला आहे. सुरत, कच्छसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात गेल्या ४८ तासांत मुसळधार पावसामुळे नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे जिल्ह्यांतील अनेक सखल भागांमध्ये पाणी जमा झाले आहे. यातच हवामान विभागाने पावसापासून इतक्यात दिलासा नसल्याची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान विभागाने तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.


मुसळधार पावसामुळे राजकोट येथील रस्त्यांवर पाणी साचले आहे. यामुळे वाहने पूर्णपणे बुडाली आहेत. घरांमध्ये इतके पाणी भरले आहे की वयस्कर व्यक्तींना खांद्यावर उचलून रेस्क्यू केले जात आहे. रस्त्याच्या वर वाहणाऱ्या पाण्याचा वेग इतका आहे की एका बाईकस्वाराने आपला बॅलन्स गमावला. त्याने स्वत:ला कसेतरी वाचवले मात्र बाईक पाण्यात वाहून गेली.


राजकोटचे रामनाथ महादेव मंदिरही अजूनही पावसाच्या विळख्यात आहे. आजूबाजूच्या भागांमध्ये मुसळधार पावसामुळे नद्या नाले दुथड्या भरून वाहत आहेत. अनेक पूल पाण्याखाली गेले आहे. गुजरातच्या खेडामध्ये शेढी नदीची पाण्याची पातळी इतकी वाढली की आजूबाजूचे गाव जलमग्न झाले.



हवामान विभागाचा रेड अलर्ट


हवामान विभागाने कच्छ, सौराष्ट्रसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. अहमदाबाद, खेडा, आणंद, दाहोद, महिसागर, वडोदरा, पंचमहल, छोटाउदेपूर, भरूच, नर्मदामध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे. तर सूरत, तापी, नवसारी, डांग, वलसाड, दमन आणि दादरा नगर हवेली येथेही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची शिफारस

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई (भूषण रामकृष्ण गवई) यांनी सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्यानंतरचे

नोव्हेंबरपासून देशात सुरू होणार नवे नियम, जाणून घ्या सविस्तर!

नवी दिल्ली: ऑक्टोबर महिना काहीच दिवसात संपणार असून येणाऱ्या नवीन महिन्यापासून देशभरात आधारकार्डपासून

१ नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने १ नोव्हेंबरपासून वस्तू आणि सेवा कर नोंदणी आणखी सोपी करण्यासाठी नवी प्रणाली सुरू

जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’

नवी दिल्ली : विज्ञान, तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाधारित नवोन्मेषाच्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट आणि

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.