Girls Marriage: या राज्यांत मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१ वर, विधानसभेत मंजूर झाले विधेयक

शिमला : हिमाचल प्रदेशातील सुक्खू सरकारने मुलींच्या लग्नाच्या वयाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सुक्खू सरकारने मान्सून सत्राच्या आधी मुलींच्या लग्नाचे वय कमीत कमी २१ वर्षे करण्याबाबतचे विधेयक सादर केले. मंगळवारी सदनाच्या कामकाजादरम्यान बिनविरोध हे विधेयक संमत करण्यात आले. दरम्यान, आता हे विधेयक राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश विभानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सत्राची सुरूवात मंगळवारी झाली. या दरम्यान हिमाचल प्रदेश बाल विवाह प्रतिषेध विधेयक २०२४मध्ये सदनात सादर केल्यानंतर मंजूर करण्यात आले सुबे यांच्या आरोग्य, सामाजिक न्याय तसेच अधिकार मंत्री धनीराम शांडिल यांनी हे विधेयक पटलावर ठेवेल. यावर कोणतीही चर्चा झाली नाही आणि बिनविरोध हे विधेयक संमत करण्यात आले.



आधी होते १८ वर्षे वय


हिमाचल प्रदेशात आतापर्यंत मुलींच्या लग्नाचे वय १८ वर्षे होते. मात्र राज्य सरकारने ही वयोमर्यादा वाढवून २१ वर्षे केली आहे. याआधी सुक्खू कॅबिनेटने ७ महिन्यांआधी संशोधित ड्राफ्टला मंजुरी दिली होती आणि आता सदनामध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आले.

Comments
Add Comment

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे

शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला