Amravati news : अमरावतीत ९ शेतकर्‍यांना २.२७ लाखांना लुबाडले!

अमरावती : अमरावती येथील एका सीएससी केंद्रावर काही शेतकर्‍यांनी फळपीक विमा काढण्यासाठी संचालकाकडे प्रीमियमची रक्कम दिली. त्याने ती रक्कम भरल्याच्या संगणकीकृत पावत्या शेतकर्‍यांना दिल्या; परंतु त्या शेतकर्‍यांना नुकसान झाल्यावरही पीकविमा संरक्षित रक्कम मिळाली नाही. त्यावेळी शेतकर्‍यांनी चौकशी केली असता त्याने बनावट पावत्या देऊन ही प्रीमियम रक्कम शासनाकडे भरलीच नसल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी शेतकर्‍याच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी सीएससी संचालक अमोल चरणदास क्षीरसागर (३०) रा. वरूड यांच्याविरुद्ध रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.


या प्रकरणात पोलिसांकडे नीलेश दिनेश देशमुख (३९) रा. टेंभुरखेडा यांच्यासह आठ शेतकर्‍यांनी तक्रार दिली आहे. २०२२ मध्ये नीलेश देशमुख यांच्यासह अन्य काही शेतकर्‍यांनी क्षीरसागर यांच्या सीएससी सेंटरवर जाऊन फळपीक विमा घेण्यासाठी २ लाख २७ हजार ३८४ रुपये प्रीमियम रक्कम भरली. याच दरम्यान काही शेतकर्‍यांनी फळपीक विमा प्रीमियम रक्कम बँकेत भरून विमा घेतला. कारण बँकेत आणि सीएससी अशा दोन्ही ठिकाणाहून विमा घेण्याची सुविधा उपलब्ध होती.


दरम्यान ज्या शेतकर्‍यांनी बँकेत प्रीमियम भरला होता, त्या शेतकर्‍यांना झालेल्या नुकसानीचा विमा मंजूर होऊन २०२३ मध्ये पैसे मिळाले. वास्तविक, यावेळी नुकसान या आठ शेतकर्‍यांचेही झाले, परंतु त्यांना विमा रक्कम मिळाली नाही. त्यांनी याबाबत बँकेत चौकशी केली असता त्यांच्या खात्यात विम्याची रक्कमच जमा झाली नव्हती. दरम्यान या शेतकर्‍यांनी क्षीरसागर यांच्याकडे विचारणा केली, त्यावेळी त्याने सुरुवातीला तुमची रक्कम भरली आहे, विमा येईल अशा पद्धतीने उडवाउडवीचे उत्तर दिले. शेतकर्‍यांना संशय आल्यानंतर मात्र त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. क्षीरसागरने त्यांना पैसे भरल्याची पावती दिली होती. ती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी ही पावती कृषी विभागाच्या अधिकार्‍यांकडून तपासून घेतली. त्यावेळी ही पावती बनावट असल्याचे समोर आले.


Comments
Add Comment

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन