किरणसोबतच्या घटस्फोटानंतर तिसऱ्यांदा लग्न करणार आमिर खान?

  65

मुंबई: आमिर खान आपल्या सिनेमांसोबतच खाजगी जीवनासाठीही नेहमी चर्चेत राहतात. खाजगी आयुष्याबद्दल लोक आमिरला अनेक सवाल करतात. आमिर खानने २ लग्ने केली. त्याने पहिले लग्न रीना दत्ता हिच्याशी केले होते. १९८६मध्ये आमिर आणि रीनाचे लग्न झाले होते.


त्यांचे हे लग्न १६ वर्षे टिकले होते. रीना आणि आमिर यांना दोन मुले आयरा आणि जुनैद आहे. रीनानंतर आमिर खानने किरण रावशी लग्न केले होते. किरण आणि आमिर यांना एक मुलगा आझाद आहे. काही वर्षांर्पूर्वी किरण आणि आमिर वेगळे झाले आहेत. रीना आणि किरणच्या या आयुष्यातून गेल्यानंतर आता प्रत्येकजण आमिरला विचारत आहे की तो तिसरे लग्न करणार का? यावर आमिरने मौन सोडले आहे.


किरण आणि आमिर यांनी २०२१मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले होते. आता नुकतेच आमिर रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये गेला होतो. तेथे त्याला पुन्हा लग्नाबाबत विचारण्यात आले.



तिसऱ्यांदा लग्न करणार आमिर?


जेव्हा रियाने आमिरला तिसऱ्या लग्नाबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला, मी आता ५९ वर्षांचा झालो आहोत. मला नाही वाटत की मी पुन्हा लग्न करू शकेन. कठीण वाटत आहे. माझ्या आयुष्यात सध्या अनेक नाती आहेत. मी पुन्हा माझ्या कुटुंबाशी जोडले गेलेलो आहे. माझी मुले, भाऊ, बहिणी आहेत. मी त्यांच्यांसोबत खुश आहे जे माझ्याजवळ आहेत. मी एक चांगला माणूस बनण्याच्या दिशेने काम करत आहे.

Comments
Add Comment

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न...

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..

हिंदी भाषा सक्तीचा जीआर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढला. या जीआरनुसार मराठी भाषा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी हाताने विणले जात आहे वस्त्र..

झी टॉकीजचा 'हँडलूम कॅन्टर' यंदाच्या वारीत सज्ज झाला आहे. सध्या फलटण फाट्याजवळ विठोबासाठी भक्तीचं वस्त्र विणलं

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय

Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या

भारतीय रेल्वे अपघातांवर अभिनेते मिलिंद गवळींची उद्विग्न प्रतिक्रिया: "पाकिस्तान-बांग्लादेशपेक्षा बरी, पण..."

मुंबई: लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सोशल