किरणसोबतच्या घटस्फोटानंतर तिसऱ्यांदा लग्न करणार आमिर खान?

मुंबई: आमिर खान आपल्या सिनेमांसोबतच खाजगी जीवनासाठीही नेहमी चर्चेत राहतात. खाजगी आयुष्याबद्दल लोक आमिरला अनेक सवाल करतात. आमिर खानने २ लग्ने केली. त्याने पहिले लग्न रीना दत्ता हिच्याशी केले होते. १९८६मध्ये आमिर आणि रीनाचे लग्न झाले होते.


त्यांचे हे लग्न १६ वर्षे टिकले होते. रीना आणि आमिर यांना दोन मुले आयरा आणि जुनैद आहे. रीनानंतर आमिर खानने किरण रावशी लग्न केले होते. किरण आणि आमिर यांना एक मुलगा आझाद आहे. काही वर्षांर्पूर्वी किरण आणि आमिर वेगळे झाले आहेत. रीना आणि किरणच्या या आयुष्यातून गेल्यानंतर आता प्रत्येकजण आमिरला विचारत आहे की तो तिसरे लग्न करणार का? यावर आमिरने मौन सोडले आहे.


किरण आणि आमिर यांनी २०२१मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले होते. आता नुकतेच आमिर रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये गेला होतो. तेथे त्याला पुन्हा लग्नाबाबत विचारण्यात आले.



तिसऱ्यांदा लग्न करणार आमिर?


जेव्हा रियाने आमिरला तिसऱ्या लग्नाबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला, मी आता ५९ वर्षांचा झालो आहोत. मला नाही वाटत की मी पुन्हा लग्न करू शकेन. कठीण वाटत आहे. माझ्या आयुष्यात सध्या अनेक नाती आहेत. मी पुन्हा माझ्या कुटुंबाशी जोडले गेलेलो आहे. माझी मुले, भाऊ, बहिणी आहेत. मी त्यांच्यांसोबत खुश आहे जे माझ्याजवळ आहेत. मी एक चांगला माणूस बनण्याच्या दिशेने काम करत आहे.

Comments
Add Comment

ज्येष्ठ संगीतकार ओ. पी नय्यर यांना मरणोत्तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मंत्री आशिष शेलार यांची घोषणा; गायिका उत्तरा केळकर यांना मोहम्मद रफी पुरस्कार मुंबई: हिंदीमधील अजरामर

‘एकाकी’मधील जॉनर बदलासाठी आशिष चंचलानीचे एस.एस. राजामौलींने केले कौतुक

आशिष चंचलानी, जे भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल स्टार्सपैकी एक आहेत आणि ज्यांची देशभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे,

साऊथचे सुपरस्टार 'रजनीकांत' चे काय आहे खरे नाव ?

रजनीकांत म्हणून ओळखले जाणारे दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटांमद्धे नावाजलेले असे ,'थलायवा' अर्थात रजनीकांत

यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप

करिअर : सुरेश वांदिले यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप या शिष्यवृत्तीचा कालावधी दोन वर्षांचा आहे. या कालावधीत संबंधित

व्ही. शांताराम चित्रपटातील जयश्रीच्या भूमिकेत तमन्ना भाटिया

भारतीय सिनेमातील महान दिग्दर्शक आणि निर्माता शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांच्या जीवनावर आधारित

हेमंत ढोमे यांच्या शाळेत ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’चा संगीत अनावरण सोहळा

रत्नाकर मतकरींचं ‘स्वर्गात आकाशगंगा’ नव्या अंदाजात ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटातील