Mumbai Crime : मुंबईत महिला डॉक्टरला मारहाण, कोलकाताची पुनरावृत्ती करण्याची धमकी

मुंबई : मुंबईच्या मानखुर्द (Mumbai Crime) येथे पार्किंगच्या वादातून एका १६ वर्षीय तरुणाने महिला डॉक्टरला मारहाण केली आणि कोलकातातील घटनेची पुनरावृत्ती करण्याची गंभीर धमकी दिली आहे. हा प्रकार येथील साठेनगर परिसरात घडला.



नेमके प्रकरण काय?


महिला डॉक्टरने आपल्या दवाखान्याचे शटर उघडण्यासाठी समोर पार्क केलेली स्कूटी हलवली होती. काही वेळानंतर तरुणाने डॉक्टरकडे स्कूटी कोणी हलवली याची चौकशी केली. त्यावर महिला डॉक्टरने स्कूटी हलवल्याचे सांगितले. त्यावर तरुणाने डॉक्टरला शिवीगाळ केली, ज्यामुळे डॉक्टरने रागाच्या भरात त्याच्या कानशिलात लगावली.


या घटनेनंतर तरुणाने तीन महिला नातेवाईकांसोबत येऊन डॉक्टरला मारहाण केली. यावेळी तरुणाने धमकी दिली की, "कोलकात्यात काय झालं माहितीये ना, तशीच तुझीही अवस्था करेन." या धमकीने महिला डॉक्टर अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी लगेचच मानखुर्द पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.


दरम्यान, पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून, तक्रारीच्या आधारे चौकशी सुरू केली आहे. परंतु समाजात अशा घटनांचा प्रसार रोखण्यासाठी योग्य कारवाई होणे आवश्यक आहे, अन्यथा अशा धमक्या आणि हल्ल्यांमुळे समाजातील महिलांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते.

Comments
Add Comment

स्वतंत्र न राहता दोन्ही राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष येणार एकत्र

गट स्थापन करत आपला नेमणार गटनेता, विविध समित्यांमध्ये मिळवणार स्थान मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत

Dahisar Bhayandar Metro 9 Line Railway : दहिसर-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली! मेट्रो-९ ला 'ग्रीन सिग्नल', १० स्थानके, १३ किमी मार्गाचा रुट; फेब्रुवारीत धावणार पहिली ट्रेन

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुका: मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पुन्हा एकदा पुढे,कधी आहेत?

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुळीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात

मुख्यमंत्र्यांनी केली तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा; एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

मुंबई : स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या

बारावी–दहावी परीक्षेआधी महाराष्ट्र बोर्डाचा निर्णय, नियम, मार्गदर्शन, प्रेरणा सर्व काही यूट्यूब चॅनेलवर

मुंबई : बारावी आणि दहावी परीक्षांच्या आधी, महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थी, शाळा आणि परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना

टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या