Bus Accident : गाय आडवी आल्याने शिवशाही बस उलटली!

अनेक प्रवासी जखमी, दोघांचा मृत्यू


अमरावती : अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ शिवारात एसटी महामंडळाच्या बसचा भीषण (Bus Accident) अपघात झालाय. बस पलटी झाल्याने अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी २ प्रवाश्यांच्या मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

नागपूर अकोला बस क्रमांक एमएच ०९-इएन १७७८ शिवशाही बस नागपूर वरून अकोल्या करीता प्रवाशी घेऊन निघाली असता अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ शिवारात महामार्गावर एक गाय आडवी आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने शिवशाही बस ही रस्त्यालगत पलटी झाली. परिणामी या बसमध्ये प्रवास करीत असलेले काही प्रवाशी हे गंभीर जखमी झाले आहेत. तर, दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


सदरचा अपघात हा सकाळी ९ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास झाल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांनी बघितले व मदतीसाठी धावले पलटी झालेल्या बस मधून प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर क्रेनच्या साह्याने बस उभी करण्यात आली. सर्व जखमी प्रवाश्याना ग्रामीण रुग्णालय व काहींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Comments
Add Comment

PM Surya Ghar yojana : 'पंतप्रधान सूर्य घर' योजनेत महाराष्ट्राची बाजी

- उत्तर प्रदेश, गुजरातला टाकले मागे; चार महिन्यांत १ लाख ८ हजार घरांवर सौर यंत्रणा मुंबई : स्वच्छ आणि शाश्वत

भव्य राष्ट्रध्वज नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल - मुख्यमंत्री फडणवीस

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी २२,१८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

- त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा - मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबक - नाशिक मध्ये सिंहस्थ

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण,

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात