Bus Accident : गाय आडवी आल्याने शिवशाही बस उलटली!

अनेक प्रवासी जखमी, दोघांचा मृत्यू


अमरावती : अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ शिवारात एसटी महामंडळाच्या बसचा भीषण (Bus Accident) अपघात झालाय. बस पलटी झाल्याने अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी २ प्रवाश्यांच्या मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

नागपूर अकोला बस क्रमांक एमएच ०९-इएन १७७८ शिवशाही बस नागपूर वरून अकोल्या करीता प्रवाशी घेऊन निघाली असता अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ शिवारात महामार्गावर एक गाय आडवी आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने शिवशाही बस ही रस्त्यालगत पलटी झाली. परिणामी या बसमध्ये प्रवास करीत असलेले काही प्रवाशी हे गंभीर जखमी झाले आहेत. तर, दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


सदरचा अपघात हा सकाळी ९ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास झाल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांनी बघितले व मदतीसाठी धावले पलटी झालेल्या बस मधून प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर क्रेनच्या साह्याने बस उभी करण्यात आली. सर्व जखमी प्रवाश्याना ग्रामीण रुग्णालय व काहींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या