Weight loss : वजन कमी करण्यासाठी उपाशी राहू नका, खा हे पदार्थ

  53

मुंबई: वाढते वजन ही आजकाल प्रचंड वाढत चाललेली समस्या आहे. अधिक वजन वाढल्याने चालण्याफिरण्यास तसेच काम करण्यास त्रास होतो. लठ्ठपणामुळे अनेक आजारही होतात. जर तुम्हीही वजन वाढीने त्रस्त आहात तर आपल्या डाएटमध्ये काही खास पदार्थांचा समावेश करू शकता ज्यामुळे वजन कमी होईल.


आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. म्हणजेच वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही तर खाऊन-पिऊनही तुम्ही वजन कमी करू शकता.



अंडी


वजन कमी करण्यासाठी अंडी फायदेशीर मानली जातात. हाय प्रोटीन आणिफॅटने भरपूर असलेली अंडी खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते.



हिरव्या भाज्या


पालक आणि हिरव्या भाज्या फायबर आणि पोषकतत्वांनी भरपूर असतात. हे खाल्ल्याने तुम्हाला हायड्रेट फील होते. हिरव्या भाज्यांमध्ये Thylakoids असते ज्याचे काम भूक संतुलित करणे असते.



मासे


माशांमध्ये हाय प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि इतर पोषकतत्वे असतात. या सर्व गोष्टी वजन संतुलित राखण्यास मदत करतात. वेट लॉससाठी तुम्ही मासे ग्रिल अथवा बेक करून खाऊ शकता. सोबतच योग्य प्रमाणात माशाचे सेवन केले पाहिजे.



नट्स


बदाम, अक्रोड या सुकामेव्यामध्ये हेल्दी अनसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर असतात. हा प्रोटीन, फायबर आणि इतर पोषकतत्वांचा चांगला स्त्रोत आहे.



कंदमुळे, बटाटा


बटाटा आणि जमिनीच्या आत असणारी कंदमुळे यांचे सेवन वजन घटवण्यात फायदेशीर ठरतात. याचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी