Weight loss : वजन कमी करण्यासाठी उपाशी राहू नका, खा हे पदार्थ

  47

मुंबई: वाढते वजन ही आजकाल प्रचंड वाढत चाललेली समस्या आहे. अधिक वजन वाढल्याने चालण्याफिरण्यास तसेच काम करण्यास त्रास होतो. लठ्ठपणामुळे अनेक आजारही होतात. जर तुम्हीही वजन वाढीने त्रस्त आहात तर आपल्या डाएटमध्ये काही खास पदार्थांचा समावेश करू शकता ज्यामुळे वजन कमी होईल.


आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. म्हणजेच वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही तर खाऊन-पिऊनही तुम्ही वजन कमी करू शकता.



अंडी


वजन कमी करण्यासाठी अंडी फायदेशीर मानली जातात. हाय प्रोटीन आणिफॅटने भरपूर असलेली अंडी खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते.



हिरव्या भाज्या


पालक आणि हिरव्या भाज्या फायबर आणि पोषकतत्वांनी भरपूर असतात. हे खाल्ल्याने तुम्हाला हायड्रेट फील होते. हिरव्या भाज्यांमध्ये Thylakoids असते ज्याचे काम भूक संतुलित करणे असते.



मासे


माशांमध्ये हाय प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि इतर पोषकतत्वे असतात. या सर्व गोष्टी वजन संतुलित राखण्यास मदत करतात. वेट लॉससाठी तुम्ही मासे ग्रिल अथवा बेक करून खाऊ शकता. सोबतच योग्य प्रमाणात माशाचे सेवन केले पाहिजे.



नट्स


बदाम, अक्रोड या सुकामेव्यामध्ये हेल्दी अनसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर असतात. हा प्रोटीन, फायबर आणि इतर पोषकतत्वांचा चांगला स्त्रोत आहे.



कंदमुळे, बटाटा


बटाटा आणि जमिनीच्या आत असणारी कंदमुळे यांचे सेवन वजन घटवण्यात फायदेशीर ठरतात. याचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर