Weight loss : वजन कमी करण्यासाठी उपाशी राहू नका, खा हे पदार्थ

मुंबई: वाढते वजन ही आजकाल प्रचंड वाढत चाललेली समस्या आहे. अधिक वजन वाढल्याने चालण्याफिरण्यास तसेच काम करण्यास त्रास होतो. लठ्ठपणामुळे अनेक आजारही होतात. जर तुम्हीही वजन वाढीने त्रस्त आहात तर आपल्या डाएटमध्ये काही खास पदार्थांचा समावेश करू शकता ज्यामुळे वजन कमी होईल.


आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. म्हणजेच वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही तर खाऊन-पिऊनही तुम्ही वजन कमी करू शकता.



अंडी


वजन कमी करण्यासाठी अंडी फायदेशीर मानली जातात. हाय प्रोटीन आणिफॅटने भरपूर असलेली अंडी खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते.



हिरव्या भाज्या


पालक आणि हिरव्या भाज्या फायबर आणि पोषकतत्वांनी भरपूर असतात. हे खाल्ल्याने तुम्हाला हायड्रेट फील होते. हिरव्या भाज्यांमध्ये Thylakoids असते ज्याचे काम भूक संतुलित करणे असते.



मासे


माशांमध्ये हाय प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि इतर पोषकतत्वे असतात. या सर्व गोष्टी वजन संतुलित राखण्यास मदत करतात. वेट लॉससाठी तुम्ही मासे ग्रिल अथवा बेक करून खाऊ शकता. सोबतच योग्य प्रमाणात माशाचे सेवन केले पाहिजे.



नट्स


बदाम, अक्रोड या सुकामेव्यामध्ये हेल्दी अनसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर असतात. हा प्रोटीन, फायबर आणि इतर पोषकतत्वांचा चांगला स्त्रोत आहे.



कंदमुळे, बटाटा


बटाटा आणि जमिनीच्या आत असणारी कंदमुळे यांचे सेवन वजन घटवण्यात फायदेशीर ठरतात. याचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण