Weight loss : वजन कमी करण्यासाठी उपाशी राहू नका, खा हे पदार्थ

मुंबई: वाढते वजन ही आजकाल प्रचंड वाढत चाललेली समस्या आहे. अधिक वजन वाढल्याने चालण्याफिरण्यास तसेच काम करण्यास त्रास होतो. लठ्ठपणामुळे अनेक आजारही होतात. जर तुम्हीही वजन वाढीने त्रस्त आहात तर आपल्या डाएटमध्ये काही खास पदार्थांचा समावेश करू शकता ज्यामुळे वजन कमी होईल.


आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. म्हणजेच वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही तर खाऊन-पिऊनही तुम्ही वजन कमी करू शकता.



अंडी


वजन कमी करण्यासाठी अंडी फायदेशीर मानली जातात. हाय प्रोटीन आणिफॅटने भरपूर असलेली अंडी खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते.



हिरव्या भाज्या


पालक आणि हिरव्या भाज्या फायबर आणि पोषकतत्वांनी भरपूर असतात. हे खाल्ल्याने तुम्हाला हायड्रेट फील होते. हिरव्या भाज्यांमध्ये Thylakoids असते ज्याचे काम भूक संतुलित करणे असते.



मासे


माशांमध्ये हाय प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि इतर पोषकतत्वे असतात. या सर्व गोष्टी वजन संतुलित राखण्यास मदत करतात. वेट लॉससाठी तुम्ही मासे ग्रिल अथवा बेक करून खाऊ शकता. सोबतच योग्य प्रमाणात माशाचे सेवन केले पाहिजे.



नट्स


बदाम, अक्रोड या सुकामेव्यामध्ये हेल्दी अनसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर असतात. हा प्रोटीन, फायबर आणि इतर पोषकतत्वांचा चांगला स्त्रोत आहे.



कंदमुळे, बटाटा


बटाटा आणि जमिनीच्या आत असणारी कंदमुळे यांचे सेवन वजन घटवण्यात फायदेशीर ठरतात. याचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

Comments
Add Comment

उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे,

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

साथींच्या आजारापासून मुलांना दूर ठेवा

विनायक बेटावदकर गणपती उत्सवापूर्वी सुमारे पंधरा दिवस, गणपती उत्सवात कल्याण शहर, ग्रामीण भागाचे हवामान साधारण