Gokulashtami 2024 : गोकुळाष्टमीसाठी मुंबई पोलीस सज्ज; प्रतिबंधात्मक आदेश जारी!

  86

काय आहेत पोलिसांचे आदेश?


मुंबई : श्रावण महिना सुरु होताच अनेक सणांची रांग लागते. नुकतेच नागपंचमी, श्रावण पौर्णिमा, रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतर आता सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोकुळाष्टमीचे (Gokulashtami 2024) वेध लागले आहेत. हिंदू धर्मात कृष्णजन्माष्टमीला सर्वात जास्त महत्व आहे. कारण या दिवशी श्रीविष्णूंचा आठवा अवतार श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळे राज्यभरात दहीहंडी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. विशेषत: याकाळात मुंबईत दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामुळे गोपाळकालाच्या दोन आठवडा आधीपासूनच दहिहंडीची तयारी करण्यासाठी युवक सज्ज होतात. यंदा २६ ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी साजरी केली जाणार असून या उत्सवाच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीसही (Mumbai Police) सज्ज झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळाष्टमीनिमित्त मुंबई पोलिसांनी मार्गदर्शक नियमावली आणि आदेश जारी केले आहेत. मुंबई पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी यासंदर्भातील परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, पादचाऱ्यांवर पाणी ओतणे, पाण्याचे फुगे मारणे तसेच गुलाल उधळण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिकरित्या अश्लील शब्दांचा उच्चार करणे, घोषणाबाजी करणे तसेच अश्लील गाणी गाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. २६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून २७ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत आदेश लागू होणार आहेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत कारवाई होणार आहे.



कशावर घालण्यात आले निर्बंध?



  • सार्वजनिकरित्या अश्लील शब्दांचे उच्चार किंवा घोषणा किंवा अश्लील गाणी गाणे.

  • हातवारे किवा नक्कल प्रस्तुतीकरणांचा वापर आणि तयार प्रतिमा, चिन्हे, फलक, किंवा इतर कोणत्याही वस्तू किंवा गोष्टींचे प्रदर्शन किंवा प्रसार करणे ज्यामुळे प्रतिष्ठा, शालीनता किंवा नैतिकता दुखावते.

  • पादचाऱ्यांवर रंगीत पाणी किंवा फवारे, रंग किंवा पावडर फवारणे किंवा फेकणे.

  • रंगीत किंवा साध्या पाण्याने किंवा कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे तयार करणे किंवा फेकणे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.