Ind Vs Eng: ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडसोबत ५ कसोटी सामने खेळणार टीम इंडिया, वेळापत्रक जाहीर

मुंबई: भारतीय संघ पुढील वर्षी जून-ऑगस्ट दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर जात आहे. येथे ते यजमान संघाविरुद्ध ५ कसोटी सामने खेळणार आहेत. या कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. गुरूवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तसेच इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने वेळापत्रक जारी केले.

हेडिंग्लेमध्ये खेळवली जाणार पहिली कसोटी


वेळापत्रकानुसार दोन्ही देशांदरम्यानचा पहिला कसोटी सामना २० जूनपासून हेडिंग्लेमध्ये होणार आहे. त्यानंतर बर्मिंगहममध्ये २ जुलैपासून दुसरा कसोटी सामना खेळवला जाईल. यानंतर दोन्ही संघ लॉर्ड्सच्या मैदानावर १० जुलैपासून मालिकेतील तिसऱ्या सामन्यात आमने-सामने होतील. त्यानंतर मँचेस्टर ला २३ जुलैपासून आणि ओव्हलच्या मैदानात ३१ जुलैपासून कसोटी सामने खेळवले जातील.

ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या सत्राचा भाग असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या सत्राची फायनल जून २०२५मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवली जाणार आहे. या फायनल सामन्याच्या काही दिवसांनीच ही पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. भारतीय संघ शेवटचा कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी २०२१मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेला होता.ही मालिका २-२ अशी बरोबरीत संपली होती. दरम्यान, कोविडच्या प्रकोपामुळे या दौऱ्यातील शेवटचा कसोटी सामना २०२२मध्ये झाला होता. हा सामना इंग्लंडने सात विकेटनी जिंकला होता.

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक


२०-२४ जून, पहिला कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ जुलै, दुसरा कसोटी सामना, बर्मिंगहॅम
१०-१४ जुलै, तिसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२३-२७ जुलै, चौथा कसोटी सामना, मँचेस्टर
३१ जुलै - ४ ऑगस्ट, पाचवा कसोटी सामना, द ओवल
Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत