भारतात वर्षभरात ७.३ कोटी नव्या इंटरनेट ग्राहकांची भर

नवी दिल्ली : भारतात गेल्या वर्षभरात ७.३ कोटी नव्या इंटरनेट ग्राहकांची भर पडली आहे. देशात मार्च २०२३ मध्ये ८८.१ कोटी इंटरनेट ग्राहक होते. तर मार्च २०२४ मध्ये ही संख्या ९५.४ कोटी झाली. गेल्या एका वर्षात तब्बल ८.३० टक्के इंटरनेट ग्राहक वाढले आहे. भारतीय दूरसंचार नियमक प्राधिकरणाच्या (ट्राय ) वार्षिक अहवालात ही माहिती पुढे आली आहे.


या अहवालात विविध सेवांमधील लक्षणीय वाढीचा कल आणि प्रमुख मापदंड अधोरेखित करण्यात आले आहेत. भारतात दूरध्वनी जोडण्यांचे एकूण प्रमाण मार्च २०२३ च्या अखेरीस ८४.५१ टक्के होते ते मार्च २०२४ अखेरपर्यंत १.३९ टक्क्यांच्या वार्षिक दराने ८५.६९ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे या अहवालात दिसून आले आहे. यासोबतच ब्रॉडबँड सेवांनी त्यांचा चढता कल कायम राखला आहे, ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या मार्च २०२३ मधील ८४.६ कोटींवरून मार्च २०२४ मध्ये ९२.४ कोटीपर्यंत वाढली असून हा मजबूत वाढीचा दर ९.१५ टक्के आहे. देशातील दूरध्वनी ग्राहकांची संख्या मार्च २०२३ अखेर ११७.२ कोटी होती ती मार्च २०२४ अखेरीस ११९.९ कोटीपर्यंत वाढली, हा वार्षिक वाढीचा दर २.३० टक्के इतका आहे. दरमहा प्रति ग्राहक सरासरी मिनिटे वापर हा २०२२- २३ या वर्षातील ९१९ वरून २०२३- २४ मध्ये ९६३ पर्यंत वाढला आणि हा वाढीचा दर ४.७३ टक्के आहे. यासोबतच समायोजित सकल महसूल देखील २०२२-२३ मधील २,४९,९०८ कोटी रुपयांवरून २०२३- २४ मध्ये २,७०,५०४ कोटी रुपयांपर्यंत वाढला असून हा वाढीचा दर ८.२४ टक्के आहे.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू