UPSC : लेटरल एंन्ट्रीच्या माध्यमातून पदभरतीला स्थगिती; युपीएससीला जाहिरात मागे घेण्याचे केंद्राचे आदेश

नवी दिल्ली : लेटरल एंट्रीच्या माध्यमातून पदांची भरती करण्याला विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केल्यानंतर केंद्र सरकारने लेटरल एंट्रीला स्थगिती देण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडून यूपीएससीला (UPSC) पत्र लिहून या संदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत.


केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी यूपीएसचीचे (UPSC) चेअरमन यांना यासंदर्भातील पत्र पाठवण्यात आले आहे. ज्यामध्ये त्यांनी यूपीए सरकारच्या काळात अशा नियुक्तांसाठी घेण्यात आलेल्या पुढाकाराचा उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रामध्ये म्हटलंय की, २००५ मध्ये वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा केंद्र सरकारने लेटरल एंट्रीची शिफारस केली होती.


दरम्यान, हल्लीच यूपीएससीकडून लेटरल एंट्रीसाठीच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र ही भरती प्रक्रिया आणि त्यामधील आरक्षणावरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर सातत्याने टीका करण्यात येत होती. दरम्यान, हा वाद दिवसेंदिवस चिघळत असल्याने अखेरीस केंद्र सरकारने पत्र लिहून यूपीएससीला थेट भरतीची जाहिरात रोखण्याचे आदेश दिले आहेत.

Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या