Kolkata case: केंद्रीय रुग्णालयांमध्ये सुरक्षा वाढवण्याचे आदेश, कोलकाता बलात्कार प्रकरणावर आज सुनावणी

नवी दिल्ली: कोलकाताच्या आरजी कर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये महिला ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार तसेच हत्या प्रकरणात गेल्या एक आठवड्यापासून निदर्शने सुरू आहे. यामुळे आरोग्य सेवांवर परिणाम झाला आहे. कोलकाता, दिल्ली, मुंबई, चंदीगढसहित सर्व प्रमुख शहरांतील सरकारी रुग्णांलयांमध्ये डॉक्टर्स आपली सुरक्षा आणि पिडितेला न्याय देण्याच्या मागणीवरून आंदोलने करत आहेत.


महिला डॉक्टरसोबत बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या विरोधात कोलकाता तसेच पश्चिम बंगालमधील अनेक भागांमध्ये शेकडो महिलांनी रविवारी रात्री रिक्लेम द नाईट अभियान राबवले. यावेळे पीडित मुलीला न्यायाची मागणी केली.



सर्वोच्च न्यायालयात सुनावणी


सर्वोच्च न्यायालयात आज २० ऑगस्टला कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणी सुनावणी होत आहे. सीबीआय आरोपीच्या पॉलिग्राफ टेस्टची तयारी करत आहे. याच्या माध्यमातून हत्या आणि या दुष्कर्माचे गुपित समोर येईल. आरोपीच्या सासूने त्याला फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी केली आहे.



केंद्र सरकारच्या रुग्णालयांमध्ये वाढणार २५ टक्के सुरक्षा


कोलकाता प्रकरणाविरोधात देशभरात ठिकाठिकाणी मोर्चे, निदर्शने, आंदोलने केली जात आहेत. यातच केंद्र सरकारने आपल्या अखत्यारित येणाऱ्या रुग्णालयांमध्ये २५ टक्के सुरक्षा वाढवण्यास मंजुरी दिली आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सर्व केंद्रीय सरकारी रुग्णालयांमध्ये लागू केल्या जाणाऱ्या सुरक्षा उपायांची यादी जाहीर केली. यात एंट्री आणि एक्झिटवर कडक नजर तसेच रात्रीच्या वेळेस महिला हेल्थकेअर वर्कर्सना एस्कॉर्ट प्रदान करणे यांचा समावेश आहे.
Comments
Add Comment

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान