मुंबई: मोहम्मद शमीच्या(mohammad shami) पुनरागमनची प्रतीक्षा त्याचे चाहते करत आहेत. भारतीय खेळाडू सध्या रिहॅबमध्ये आहे. त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना १९ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२३मध्ये खेळला होता. वर्ल्डकपचा फायनलचा हा सामना होता. वनडे वर्ल्डकपचा हा शेवटचा सामना होता. वनडे वर्ल्डकपनंतर शमीच्या टाचेची सर्जरी करण्यात आली होती. यानंतर आतापर्यंत तो मैदानात परतलेला नाही. आता शमीच्या पुनरागमनाबाबत सरळ उत्तर मिळाले आहे.
रिपोर्टनुसार शमी ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी रणजी ट्रॉफीसाठी बंगालकडून मैदानात उतरेल. रणजी ट्रॉफीची सुरूवात ११ ऑक्टोबरपासून होत आहे. ११ ऑक्टोबरला बंगालचासामना उत्तरप्रदेशविरुद्ध होईल. यात शमी खेळताना दिसू शकतो. रणजीनंतर शमी १९ ऑक्टोबरलासून न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मैदानावर दिसू शकतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये शमीच्या पुनरागनचे संकेत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिले आहेत. ते म्हणाले, आमची टीम आधीपेक्षा चांगली तयार आहे. आम्ही काही काळासाठी जसप्रीत बुमराहला आराम दिला. शमी फिट होण्याची आम्ही आशा करतो.
मोहम्मद शमीकडे तीनही फॉरमॅट खेळण्याचा अनुभव आहे. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत ६४ कसोटी १०१ वनडे आणि २३ टी-२० सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने २२९ विकेट घेतलेत. तर वनडेत शमीने १९५ तर टी-२०मध्ये २४ विकेट घेतल्या आहेत.