Ajit Pawar : अजितदादांची राष्ट्रवादी लढवणार जम्मू काश्मीरची निवडणूक!

उमेदवारांची नावंही निश्चित केल्याची माहिती


मुंबई : नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) पत्रकार परिषद घेत हरियाणा (Haryana) आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुका (Jammu Kashmir Vidhansabha Election) जाहीर केल्या. मात्र, यावेळी महाराष्ट्रातील निवडणुका लांबणीवर जाणार असल्याचे कळले. तरीही महाराष्ट्रातील सर्वच पक्ष आतापासूनच विधानसभेसाठी कंबर कसून तयारी करत असल्याचे समजले. यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. यासाठी त्यांनी उमेदवारांची नावंही निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरमधील जवळपास २५ जागांवर अजित पवार गटाकडून उमेदवार दिले जाणार आहेत. यातील १० ते १५ उमेदवारांची नावं जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. पुढील म्हणजेच सप्टेंबर महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये ३ टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर ४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. गेल्या १० वर्षांपासून जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक झाली नाही. कलम ३७० हटवल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.


जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या ८३ जागा होत्या. पण यंदा ७ जागा वाढल्या असून ९० जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी अजित पवार गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. नुकतेच अजित पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी त्या ठिकाणी दौरा केला. ८ दिवसांच्या या दौऱ्यात त्यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यासोबतच त्यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काही उमेदवारांची नावे सुचवली. यातील १० ते १५ जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. अजूनही काही उमेदवारांच्या नावांची चाचपणी केली जात असून लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.

Comments
Add Comment

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१