Government Job : तरुणांसाठी आनंदाची बातमी! परीक्षा न देताच मिळणार भरघोस पगाराची सरकारी नोकरी

मुंबई : सध्या अनेक तरुण भरघोस पगारासह सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असतात. अशाच तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरं तर सरकारी नोकरी मिळण्यासाठी अनेक परीक्षा द्याव्या लागतात. केंद्रिय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) लॅटरल एंट्री साठी अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये नोकरी मिळवण्यासाठी कोणत्याही परीक्षा द्यावी लागणार नाही. यूपीएससी परीक्षा ही देशातील सर्वात अवघड परीक्षा असते. या परीक्षेत पास होण्यासाठी अनेक वर्ष मन लावून जिद्दीने अभ्यास करावा लागतो. परंतु अनेकांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते. त्यामुळे आता तरुणांची सरकारी नोकरी करण्याची इच्छा पूर्ण होणार आहे.


केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ४५ पदांसाठी जाहिरात दिली, ज्यामध्ये १० सहसचिव आणि ३५ संचालक/उपसचिव पदांचा समावेश आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ सप्टेंबर असून उमेदवार www.upsconline.nic.in या अधिकृत वेबसाईटवरुन अर्ज करु शकतात.



वयोमर्यादा आणि वेतन


४० ते ५५ वयोगटातील उमेदवार संयुक्त सचिव पदासाठी अर्ज करु शकतात. या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार, १४व्या वेतन स्तरानुसार पगार देण्यात येईल. त्यांचे मासिक उत्पन्न २,७०,००० रुपये आहे. याशिवाय प्रवास भत्ता आणि घरभाडे भत्ता दिला जातो.


३५ ते ४५ वयोगटातील उमेदवारांची निवड संचालक पदासाठी केली जाणार आहे. त्यांना १३ व्या वेतन स्तरानुसार पगार देण्यात येईल. त्यांचे मासिक उत्पन्न २,३०,००० रुपये असेल. तर उपसचिव पदासाठी १,५२,००० रुपये पगार दिला जाईल.



कोणते उमेदवार अर्ज करु शकतात?


केंद्र सरकारमध्ये काम करणारा कोणताही कर्मचारी या नोकरीसाठी अर्ज करु शकत नाही. परंतु राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये काम करणारे, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्वायत्त संस्था, विद्यापीठे, खाजगी कंपन्या, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणारे लोक लॅटरल एंट्रीअंतर्गत अर्ज करु शकतात.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे