Satara News : सातारकरांच्या सेवेसाठी ई-बसेस दाखल; प्रवास होणार आणखी आरामदायी!

सातारा : साताराकरांसाठी (Satara) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून प्रवाशांच्या सेवेसाठी नव्या ई-बस (Electric Bus) सेवा सुरु करणार असल्याची घोषणा केली होती. त्यापासून कित्येक दिवस ई-बसची वाट पाहणाऱ्या नागरिकांची आता प्रतिक्षा संपली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये ई बसेस गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे साताराकरांचा आता वातानुकूलित (Air Conditioning) बसमधून आरामदायी प्रवास होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच एसटी महामंडळाच्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ई-बस सेवा सुरु केली आहे. साताऱ्यातील एसटी स्टँड मध्ये पहिल्या टप्प्यात पाच गाड्या दाखल झाल्या असून एसटी महामंडळाच्या आवारात ई-बस साठी आवश्यक असणारी चार्जिंग पॉईंटसुद्धा तयार करण्यात आली आहेत. या सर्व गाड्या वातानुकूलित असून ऑटोमॅटिक स्वरूपाच्या आहेत. या गाड्यांमध्ये साधारण ३५ प्रवासी वाहतूक करण्याची क्षमता आहे.


दरम्यान, प्रवाशांचा प्रतिसाद आणि गरज लक्षात घेता या गाड्यांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. तसेच या बसेसमुळे आता इंधनाचा खर्चही कमी होणार असल्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

सिंहस्थापूर्वी कुशावर्त कुंडासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड येथे सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर

राज्यात लॉकडाऊन अजिबात लागणार नाही - मुख्यमंत्री फडणवीस

- अफवा पसरवणाऱ्यांना फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात इंधन आणि गॅसचा

Ashok Kharat Case Update: अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर, भोंदूबाबाची HIV टेस्ट पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?

नाशिक: नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरातच्या अत्याचार प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून

एसआयटीला अशोक खरातच्या ऑफिसमध्ये काय काय दिसलं?

मुंबई: अशोक खरात याला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून कसून

श्रीरामपूरमध्ये राम नवमीदिवशी मिरवणुकीवर दगडफेक, १२ जणांवर गुन्हा

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात रामनवमीच्या उत्सवाला दगडफेकीचे गालबोट लागले आहे. गोंधवणी

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात विरुद्धच्या तक्रारींना पूर; SIT च्या हेल्पलाईनवर १०० हून अधिक तक्रारी दाखल

मुंबई : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. अघोरी पूजा आणि