Eknath Shinde : आमच्या बहिणींच्या कोणी आडवं आलं तर गाठ माझ्याशी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा


पुणे : “मी एकच सांगतो की एकवेळा आमच्यावर टीका केली तर आम्ही सहन करू. मात्र, आमच्या बहिणींच्या हिताच्या आडवं कोणी आलं तर मग गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवा”, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांना दिला.


महायुती सरकारने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेची मोठी चर्चा आहे. मात्र, या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत. आता जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा निधी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवरच आज पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत इशारा दिला.


“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मी मंत्रिमंडळात सांगितलं होतं की, रक्षाबंधनाच्या अगोदर या योजनेचे पैसे पोहोचले पाहिजेत. मात्र, हे पैसे पोहोचले की नाही ते पाहण्यासाठी काही लोक म्हणाले की, आधी एक रुपया टाकूयात. त्यांना मी म्हटलं जर एक रुपया टाकला तर विरोधक म्हणतील ३ हजार देणार म्हणाले आणि १ रुपया टाकला. त्यानंतर आम्ही ठरवलं की सर्व तीनच्या तीन हजार रुपये टाकायचे आणि योजना सुरु करायची. तेव्हापासून मी ज्या ठिकाणी कार्यक्रमाला जात आहे, त्या ठिकाणी माझ्या लाडक्या बहीणी मला पैसे आल्याचे सांगतात, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये