कसोटीत होऊ शकते सूर्यकुमार यादवचे पुनरागमन, रिपोर्टमध्ये खुलासा

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर काही बदल झाले आहेत. राहुल द्रविडच्या जागी नवे कोच गौतम गंभीर आले आहेत आणि नव्या युगाची सुरूवात झाली. रोहित शर्माने टी-२० वर्ल्डकपमधून निवृत्तीची घोषणा केली. सूर्यकुमार यादवला हार्दिक पांड्या असताना संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. आता त्याचे पुनरागमन कसोटी संघात होणार असल्याची चर्चा आहे. बांग्लादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मालिकेत सूर्य यादवला संघात स्थान दिले जाऊ शकते.


मिडिया रिपोर्टनुसार टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचे पुनरागमन कसोटीत होत आहे. भारताला घरच्या मैदानावर बांग्लादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. सूर्यकुमार यादवला निवड समिती संधी देऊ शकते. पुढील महिन्यापासून बांगलादेशविरुद्ध मालिका खेळवली जाईल. तर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला १६ ऑक्टोबरपासून सुरूवात होईल.


सूर्यकुमार यादव बूची बाबू स्पर्धेत मुंबईकडून खेळत आहे. मुंबईला ग्रुप सीमध्ये ठेवण्यात आले आहे. याचे नेतृत्व सरफराज खानकडे आहे. चार दिवसांच्या फॉरमॅटमध्ये खेळवल्या जाणाऱ्या फर्स्ट क्लास सामन्यात सूर्या आपली तयारी दाखवेल. यानंतर तो दलीप ट्रॉफीमध्येही खेळताना दिसेल.

Comments
Add Comment

वेस्ट इंडिज, द. आफ्रिका आणि इंग्लंडचे क्रिकेटपटू चार्टर विमानांनी परतणार मायदेशी

अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धामुळे, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड सारखे संघ

T20 वर्ल्डकप फायनलसाठी कशी असेल अहमदाबादची खेळपट्टी ? कसे असेल हवामान आणि कोण कोणत्या खेळाडूंना मिळेल खेळण्याची संधी ?

अहमदाबाद : क्रिकेटप्रेमींसाठी ८ मार्चचा रविवार म्हणजे पर्वणी आहे. कारण आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता

आजचा ‘महामुकाबला’ कोण जिंकणार?

सुशील परब यंदाच्या टी-२० विश्वचषकाच्या या बहुप्रतिक्षित अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन बलाढ्य संघ

आयसीसी स्पर्धांमधील ऑस्ट्रेलियाची मक्तेदारी भारत मोडीत काढणार

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्डकप २०२६ चा अंतिम सामना रविवारी अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात

All England Open : 'लक्ष्य सेन'ने रचला इतिहास! सलग दुसऱ्यांदा ऑल इंग्लंड ओपन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक

लक्ष्य सेन याने २०२६ च्या ऑल इंग्लंड ओपनची अंतिम फेरी गाठत इतिहास रचला आहे. त्याने तीन सामन्यांच्या पुरुष

फक्त विजेतेपदासाठीच नाही; अनेक ऐतिहासिक शाप मोडण्यासाठीही भारत सज्ज!

मुंबई (प्रतिनिधी) : रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या फायनलमध्ये भारत आणि