कसोटीत होऊ शकते सूर्यकुमार यादवचे पुनरागमन, रिपोर्टमध्ये खुलासा

  48

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर काही बदल झाले आहेत. राहुल द्रविडच्या जागी नवे कोच गौतम गंभीर आले आहेत आणि नव्या युगाची सुरूवात झाली. रोहित शर्माने टी-२० वर्ल्डकपमधून निवृत्तीची घोषणा केली. सूर्यकुमार यादवला हार्दिक पांड्या असताना संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. आता त्याचे पुनरागमन कसोटी संघात होणार असल्याची चर्चा आहे. बांग्लादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मालिकेत सूर्य यादवला संघात स्थान दिले जाऊ शकते.


मिडिया रिपोर्टनुसार टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचे पुनरागमन कसोटीत होत आहे. भारताला घरच्या मैदानावर बांग्लादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. सूर्यकुमार यादवला निवड समिती संधी देऊ शकते. पुढील महिन्यापासून बांगलादेशविरुद्ध मालिका खेळवली जाईल. तर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला १६ ऑक्टोबरपासून सुरूवात होईल.


सूर्यकुमार यादव बूची बाबू स्पर्धेत मुंबईकडून खेळत आहे. मुंबईला ग्रुप सीमध्ये ठेवण्यात आले आहे. याचे नेतृत्व सरफराज खानकडे आहे. चार दिवसांच्या फॉरमॅटमध्ये खेळवल्या जाणाऱ्या फर्स्ट क्लास सामन्यात सूर्या आपली तयारी दाखवेल. यानंतर तो दलीप ट्रॉफीमध्येही खेळताना दिसेल.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी