कसोटीत होऊ शकते सूर्यकुमार यादवचे पुनरागमन, रिपोर्टमध्ये खुलासा

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर काही बदल झाले आहेत. राहुल द्रविडच्या जागी नवे कोच गौतम गंभीर आले आहेत आणि नव्या युगाची सुरूवात झाली. रोहित शर्माने टी-२० वर्ल्डकपमधून निवृत्तीची घोषणा केली. सूर्यकुमार यादवला हार्दिक पांड्या असताना संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. आता त्याचे पुनरागमन कसोटी संघात होणार असल्याची चर्चा आहे. बांग्लादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मालिकेत सूर्य यादवला संघात स्थान दिले जाऊ शकते.


मिडिया रिपोर्टनुसार टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचे पुनरागमन कसोटीत होत आहे. भारताला घरच्या मैदानावर बांग्लादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. सूर्यकुमार यादवला निवड समिती संधी देऊ शकते. पुढील महिन्यापासून बांगलादेशविरुद्ध मालिका खेळवली जाईल. तर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला १६ ऑक्टोबरपासून सुरूवात होईल.


सूर्यकुमार यादव बूची बाबू स्पर्धेत मुंबईकडून खेळत आहे. मुंबईला ग्रुप सीमध्ये ठेवण्यात आले आहे. याचे नेतृत्व सरफराज खानकडे आहे. चार दिवसांच्या फॉरमॅटमध्ये खेळवल्या जाणाऱ्या फर्स्ट क्लास सामन्यात सूर्या आपली तयारी दाखवेल. यानंतर तो दलीप ट्रॉफीमध्येही खेळताना दिसेल.

Comments
Add Comment

Shubman Gill Century : कर्णधार शुभमन गिल नावाचं 'वादळ' थांबायचं नाव घेत नाही! वेस्ट इंडिजला धुवून काढत रोहित शर्माचा 'हा' मोठा विक्रम मोडीत काढला.

यशस्वी जैस्वाल पाठोपाठ कर्णधार शुभमन गिलचे शानदार कसोटी शतक नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies 2nd Test Day 2)

हार्दिक पांड्या आणि माहिका शर्माचे नाते चर्चेत: एकत्र फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल

मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतेच हार्दिक आणि

'शार्दुल ठाकूर' मुंबई रणजी संघाचा नवा कर्णधार; अजिंक्य रहाणेनंतर मिळाली सूत्रे!

मुंबई: भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याची आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाने

रहस्यमय 'TEN x YOU' चा पडदा उघडला! सचिन तेंडुलकरने लाँच केला खेळाडूंच्या अनुभवातून जन्माला आलेला ब्रँड

२५ वर्षांचा अनुभव, भारतीय शरीरयष्टीनुसार खास डिझाईन; 'गल्ली ते स्टेडियम' प्रत्येक खेळाडूसाठी नवी क्रांती मुंबई:

IND vs WI: पहिला दिवस यशस्वीच्या नावावर, टीम इंडिया मजबूत स्थितीत

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ

रवींद्र जडेजा आपला ‘गुरू’ - कुलदीप यादव

अहमदाबाद : भारतीय संघाचा गोलंदाज कुलदीप यादव यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी संघातील अनुभवी गोलंदाज