Maharashtra Politics : उबाठाच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नकार; निकालानंतरच चेहरा ठरवणार

मुंबई : महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणावा. (Maharashtra Politics) काँग्रेस-राष्ट्रवादीकडून जे नाव पुढे येईल, त्याला पाठिंबा देईन असे विधान उद्धव ठाकरेंनी शुक्रवारच्या मविआच्या मेळाव्यात केले. मात्र, ठाकरेंच्या त्या मागणीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून नकार घंटा दाखवण्यात आली आहे. महाविकास आघाडी हाच चेहरा असेल. निवडणुकीच्या निकालानंतर बसून चेहरा कोण हे मविआचे आमदार ठरवतील, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.


नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीच हा चेहरा राहील असे आम्ही दोघांनी त्यांना सूचवले. त्यांना ठाकरेंनी पाठिंबा द्यावा. जसे इंडिया आघाडी म्हणून आम्ही लढलो तसेच महाविकास आघाडी म्हणून लढू. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आमदार महाविकास आघाडीचे आणायचे. त्यानंतर मुख्यमंत्री कोण याचा निर्णय वरिष्ठांनी करायचा. जो काही निर्णय वरिष्ठ देतील त्यांच्या आदेशाचे पालन सर्वजण करू, असे त्यांनी सांगितले.


तसेच मुख्यमंत्रिपदाचा कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याचा मुख्यमंत्री आमदारांमधून निश्चित व्हावा. अजून जागावाटपावर चर्चा नाही. २१ ऑगस्टपासून जागावाटपावर चर्चा होईल. आमच्या सगळ्यांची तयारी आहे. २१ तारखेला जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल. आज आमचे बोलणे झाले आहे, त्याआधारे फॉर्म्युला ठरेल, असे नाना पटोलेंनी स्पष्ट केले.


दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केले आहे. महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री होते. लोकसभेतही ते सर्व महाराष्ट्रभर फिरलेत. त्यामुळे प्रचार करण्याचं काम त्यांनीच केले. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते यांनी प्रचार केला. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाबाबत आमच्यात वाद नाही. योग्यवेळी त्याबाबतीतले निर्णय होतील. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून राहिलेत त्यामुळे काहींच्या जागा त्या स्तरावर आहेतच असे सांगत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली नाही.



शिवसेना शिंदे गटाचा ठाकरेंना टोला


लाचारी किती असावी याचे ज्वलंत उदाहरण आज पाहायला मिळाले. प्रास्ताविक उद्धव ठाकरेंनी करावे त्यात येणारा मुख्यमंत्री तुम्ही सांगावे, माझ्या त्याला पाठिंबा आहे असे सांगूनही महाविकास आघाडीने त्यांचा उमेदवार जाहीर केला नाही हेच त्यांचे दुर्दैव आहे. त्यामुळे या मशालीची आग स्वत:च्या बुडाला लावून घेतली की काय असे चित्र त्यातून उभे राहते. त्यामुळे आपल्याच मशालीने शिवसैनिकांचे घर जाळणारे तुम्ही आहात असा टोला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

Comments
Add Comment

Alandi Flood : पूरग्रस्त आळंदीसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय

- विविध विकास कामांसाठी एकूण १० कोटींचा विशेष निधी मंजूर! मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार

Rahuri : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात ; लालपरी, कारच्या अपघातात तीनजण गंभीर

Rahuri : नगर-मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad highway) कोल्हार खुर्द शिवारात राज्य परिवहन महामंडळाची बस व कारचा समोरासमोर भीषण

Ahilyanagar : धुवाधार पावसाचा कहर ! घाटघर येथे ३२१ मिमी पावसाची नोंद, अनेक धबधबे, किल्ले आणि ट्रेकिंग मार्गांवर प्रवेशबंदी

Ahilyanagar : अकोले तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून हरिश्चंद्रगड-भंडारदरा (Harishchandragad and Bhandardara) परिसरात

Tukaram Maharaj Palkhi Sohala 2026 : तुकोबाराय व माऊलींच्या पालखी स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड सज्ज

पुणे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी

Satara : महाबळेश्वरमध्ये 24 तासांत 513 मिमिची नोंद, 100 वर्षांतील विक्रमी पाऊस

Satara : मराठवाडा वगळता राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई (Mumbai), पुणे , नाशिक याठिकाणी पावसाने मोठ्या

Chandrashekhar Bawankule : गौण खनिजाची चोरी रोखण्यासाठी कोकणासह प्रमुख शहरांमध्ये 'ड्रोन' सर्वेक्षण

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा; गौण खनिजांच्या देखरेखीसाठी कोकणात हायटेक