Maharashtra Politics : उबाठाच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नकार; निकालानंतरच चेहरा ठरवणार

मुंबई : महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणावा. (Maharashtra Politics) काँग्रेस-राष्ट्रवादीकडून जे नाव पुढे येईल, त्याला पाठिंबा देईन असे विधान उद्धव ठाकरेंनी शुक्रवारच्या मविआच्या मेळाव्यात केले. मात्र, ठाकरेंच्या त्या मागणीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून नकार घंटा दाखवण्यात आली आहे. महाविकास आघाडी हाच चेहरा असेल. निवडणुकीच्या निकालानंतर बसून चेहरा कोण हे मविआचे आमदार ठरवतील, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.


नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीच हा चेहरा राहील असे आम्ही दोघांनी त्यांना सूचवले. त्यांना ठाकरेंनी पाठिंबा द्यावा. जसे इंडिया आघाडी म्हणून आम्ही लढलो तसेच महाविकास आघाडी म्हणून लढू. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आमदार महाविकास आघाडीचे आणायचे. त्यानंतर मुख्यमंत्री कोण याचा निर्णय वरिष्ठांनी करायचा. जो काही निर्णय वरिष्ठ देतील त्यांच्या आदेशाचे पालन सर्वजण करू, असे त्यांनी सांगितले.


तसेच मुख्यमंत्रिपदाचा कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याचा मुख्यमंत्री आमदारांमधून निश्चित व्हावा. अजून जागावाटपावर चर्चा नाही. २१ ऑगस्टपासून जागावाटपावर चर्चा होईल. आमच्या सगळ्यांची तयारी आहे. २१ तारखेला जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल. आज आमचे बोलणे झाले आहे, त्याआधारे फॉर्म्युला ठरेल, असे नाना पटोलेंनी स्पष्ट केले.


दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केले आहे. महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री होते. लोकसभेतही ते सर्व महाराष्ट्रभर फिरलेत. त्यामुळे प्रचार करण्याचं काम त्यांनीच केले. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते यांनी प्रचार केला. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाबाबत आमच्यात वाद नाही. योग्यवेळी त्याबाबतीतले निर्णय होतील. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून राहिलेत त्यामुळे काहींच्या जागा त्या स्तरावर आहेतच असे सांगत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली नाही.



शिवसेना शिंदे गटाचा ठाकरेंना टोला


लाचारी किती असावी याचे ज्वलंत उदाहरण आज पाहायला मिळाले. प्रास्ताविक उद्धव ठाकरेंनी करावे त्यात येणारा मुख्यमंत्री तुम्ही सांगावे, माझ्या त्याला पाठिंबा आहे असे सांगूनही महाविकास आघाडीने त्यांचा उमेदवार जाहीर केला नाही हेच त्यांचे दुर्दैव आहे. त्यामुळे या मशालीची आग स्वत:च्या बुडाला लावून घेतली की काय असे चित्र त्यातून उभे राहते. त्यामुळे आपल्याच मशालीने शिवसैनिकांचे घर जाळणारे तुम्ही आहात असा टोला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

Comments
Add Comment

Ahilyanagar : भंडारदऱ्यात निसर्गाचा हाहाकार ! 24 तासांत 300 मिमी पाऊस; प्रमुख पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद

Ahilyanagar Rain : महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसाचा तांडव पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नद्या, धरणे दुथडी भरून

Chandrashekhar Bawankule: पूरग्रस्तांना तातडीने मदत, एकाही नुकसानग्रस्ताला वंचित ठेवणार नाही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासन हायअलर्टवर असून, पूरग्रस्तांना तातडीने मदत

Ketan Agrawal murder case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट; सिया आणि चेतनचे ४ महिन्यांपूर्वीच 'गुपचूप' लग्न?

पुणे : पुण्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल (Ketan Agrawal) यांच्या हत्याप्रकरणात तपासादरम्यान नवा धक्कादायक तपशील

Maharashtra rain update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम; पालघर, रायगडला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

मुंबई : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी विविध

Navale Bridge traffic rule : पुण्यात नवले ब्रिज मार्गावर ४० किमी वेगमर्यादा लागू; पालखी सोहळ्यामुळे RTO चाचण्यांच्या वेळापत्रकातही बदल

पुणे : शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी पुणे वाहतूक विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारती

Dapoli Mahabaleshwar highway : दापोली–पोलादपूर–महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गासाठी प्रवीण दरेकरांची गडकरींकडे मागणी

मुंबई : दापोली–पोलादपूरमार्गे महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देण्याची मागणी भाजपचे गटनेते तथा आमदार