Mazi Ladki Bahin : लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता! ३१ नव्हे आता 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

मुंबई : महाराष्ट्रात १ जुलै २०२४ पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सुरु करण्यात आली. या योजनेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून अजूनही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. अशातच काल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यास प्रारंभ झाला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात ३ हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. दरम्यान, या योजनेसंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत सरकारने दिली होती. मात्र आता ती मुदत आणखी वाढवण्यात येणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत १ कोटी ६४ लाख ४० हजारपेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. यातील जवळपास १ कोटी ३६ लाख पात्र महिला आहेत. तर अजूनही नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. परंतु अद्याप ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी होत्या किंवा ज्या महिलांना अर्ज करता आले नाही, त्यांच्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता या योजनेसाठी महिलांना सप्टेंबर महिन्यापर्यंत अर्ज करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व गरजू महिलांना मिळावा, हाच यामागे सरकारचा हेतू आहे,असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.



अर्ज कसा करावा?


माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सरकारने आता https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ही नवीन वेबसाइट सुरू केली आहे. नवीन वेबसाईटमुळे महिलांना गाव, वॉर्ड आणी तालुक्याची निवड करणे आता सोपे होणार आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा