बदलत्या फॅशनमुळे ‘मोगरा’ गजरा व्यवसायावर परिणाम!

महिलांची ‘चायनीज प्लास्टिक’ गजऱ्याला पसंती


कुडूस : इतरांच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या मात्र स्वतःच्या रोजच्या मिळकतीत चणचण असणाऱ्या 'मोगरा' गजरा विक्रेत्यांच्या धंद्यावर महिलांमधील बदलत्या फॅशनमुळे चांगलीच गदा आली आहे. बाजारात चायनीज ‘प्लास्टिक’ गजरा विक्रीसाठी आल्याने त्याला महिला वर्गाकडून मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळे ‘मोगरा’ गजरा व्यवसायावर याचा मोठा परिणाम झाला आहे.


काही वर्षांपूर्वी केसात मोगऱ्याचा गजरा माळणे हे सौंदर्याचे प्रतीक म्हणून समजले जात होते. आज ब्यूटिपार्लर ही पाश्चात्त्य संस्कृती जोपासली जात असल्याने मोगऱ्याच्या गजऱ्याला मागणी कमी झाली असल्याचे दिसत असून गजरा व्यवसाय करणाऱ्यांना अर्थिक चणचण भासत आहे. कुडूस या मुख्य बाजारपेठ गजरे विकणाऱ्या रवींद्र भोईर व राजा भोईर यांची ही हीच व्यथा आहे. सणासुदीचे व लग्नसराईचे दिवस वगळता बाकी दिवस धंदाच होत नसल्याने आम्हा ‘मोगरा’ गजरा विक्रेत्यांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. मुलांचे शिक्षण तसेच संसाराचा गाडा चालविण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागत असल्याचे भोईर यांनी सांगीतले. बदलत्या परिस्थितीनुसार आपल्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी स्त्रियांमध्ये ब्यूटिपार्लर पसंतीचे प्रमाण वाढीस लागल्याने केसात मोगऱ्याचा गजरा माळण्याची मराठमोळी फॅशन हळूहळू कमी होत गेली असून पाश्चात्य संस्कृती आपली पकड घट्ट करीत असल्याचे दिसत आहे.



नाईलाज म्हणून या धंद्यात तग


मोगऱ्याचा गजरा माळण्याचा उत्साह महिला वर्गामध्ये कमी झाल्याने ग्राहकांची संख्या कमालीची घटली असून साधी रोजंदारी ही सुटत नाही. समोर उदरनिर्वाहाचा कोणताही पर्याय शिल्लक नसल्याने केवल नाईलाज म्हणून या धंद्यात तग धरून राहिलो असल्याची आपली खंत कुडूस येथील 'मोगरा' गजरे विक्रेते रवींद्र भोईर व राजा भोईर यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक