जरांगेंच्या रॅलीत चोरट्यांची दिवाळी, पाच लाखांची चोरी

नाशिक : जरांगे पाटील कुणाला लाभदायी हो अथवा न हो पण नाशिकमधील चोरांना मात्र जरांगे पाटील लाभदायी झाले आहेत. त्यांच्या शांतता रॅलीच्या समारोपामध्ये पाच लाखाच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.


मंगळवारी (दि.१३) शहरात मराठा आरक्षण शांतता रॅलीचा समारोप झाला. तपोवनातून निघालेल्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने समाजबांधवांची गर्दी उसळली होती. या गर्दीची संधी साधत चोरट्यांनीही हात की सफाई केली. या गर्दीत सोन्याचांदीच्या दागिण्यांसह मोबाईल आणि पाकिटे चोरट्यांनी लांबविले असून पंचवटीत चौघांच्या गळ्यातील सुमारे पाच लाखांचे दागिणे भामट्यांनी हातोहात लांबविले. याबाबत पंचवटी आणि आडगाव पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केशव पंढरीनाथ ढोली (रा. वावरेनगर, कामटवाडे) यांनी पहिली फिर्याद दिली आहे. ढोली या रॅलीत सहभागी झाले होते. काट्यामारूती सिग्नल चौकात उभे असतांना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविली. तर मालेगाव स्टॅण्ड भागात सौरभ देवचंद महाले यांच्या गळ्यातील चैन तर सिमा माधव पिंगळे या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र असा सुमारे दीड लाखाचे अलंकार भामट्यांनी हातोहात लांबविले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.

Comments
Add Comment

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु