Central Railway : मध्य रेल्वे सुट्टीत चालवणार १८ विशेष सेवा!

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - नागपूर वातानुकूलित अतिजलद विशेष गाडी गुरुवार १५ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सकाळी १२.२५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. येताना १६ ऑगस्ट रोजी नागपूर येथून दुपारी १. ३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ४.१० वाजता पोहोचेल. हि गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबेल .


लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - मडगाव विशेष


लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून गुरुवार १५ ऑगस्ट आणि शनिवार १७ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता पोहोचेल. येताना मडगाव येथून शुक्रवार १६ ऑगस्ट आणि रविवारी १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १२.४० वाजता पोहोचेल.


हि गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर , खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड , संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, आणि कणकवली येथे थांबेल.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कोल्हापूर विशेष


मंगळवर २० ऑगस्ट रोजी सकाळी १२.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे त्याच दिवशी दुपारी १ . ३० वाजता पोहोचेल. रविवार १८ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १. ३० वाजता पोहोचेल.


हि गाडी कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज येथे थांबेल .


पुणे - नागपूर वातानुकूलित अतिजलद विशेष


गुरुवार १५ ऑगस्ट रोजी पुणे येथून संध्याकाळ ४. १० वाजता सुटेल आणि १७ ऑगस्ट रोजी नागपूर येथे ६.३० वाजता पोहोचेल. बुधवार १४ ऑगस्ट आणि शुक्रवार १६ ऑगस्ट रोजी नागपूर येथून संध्याकाळी ७. ४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल. हि गाडी उरुळी, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबेल.


कलबुर्गी - बेंगळुरू विशेष


गुरुवार १५ ऑगस्ट रोजी आणि शनिवारी १७ ऑगस्ट रोजी रोजी कलबुरगि येथून सकाळी ९. ३० वाजता सुटेल श्री एम विश्वैसरया टर्मिनल, बेंगळुरू येथे त्याच दिवशी २०.०० वाजता पोहोचेल. विशेष गाडी बुधवार १४ ऑगस्ट शुक्रवार १६ ऑगस्ट आणि गुरुवार १७ ऑगस्ट रोजी श्री एम विश्वैसरया टर्मिनल, बेंगळुरू येथून २१.१५ वाजता सुटेल आणि कलबुरगि येथे ७.४५ वाजता पोहोचेल.


हि गाडी शाहबाद, वाडी, यादगिर, रायचूर, मंत्रालयम रोड, आदोनि, गुंटकल, अनंतपूर, धर्मवरम आणि यलहंका येथे थांबेल.


या गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्कासह वरील सर्व विशेष गाड्यांचे बुकिंग आधीच सुरू आहे.

Comments
Add Comment

Kolhapur Women Abuse Case : धक्कादायक! परतवाडा प्रकरणाची कोल्हापुरात पुनरावृत्ती; तरुणीवर अत्याचार करून ...

मुंबई : नाशिक आणि अमरावतीतील घटनांनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच आता कोल्हापूर

Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा

Land Scam : अमरावती भूखंड घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेले भूखंड अन्य व्यक्तींना बेकायदेशीरपणे

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा