IND vs BAN: भारत-बांग्लादेश मालिकेच्या वेळापत्रकात झाला बदल, कधी खेळवले जाणार सामने

Share

मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यात १९ सप्टेंबरपासून कसोटी मालिकेला सुरूवात होत आहे. या मालिकेनंतर तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल. मात्र आता या मालिकेत महत्त्वाचा बदल झाला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. बीसीसीआयने सांगितले की भारत-बांग्लादेश यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आता धरमशालामध्ये खेळवला जाणार नाही. याचे आयोजन ग्वालियरमध्ये होईल.

ग्वालियरमध्ये नुकतेच नवे क्रिकेट स्टेडियम बनून तयार झाले आहे. बीसीसीआयने भारत-इंग्लंड मालिकेतही बदल केला आहे. खरंतर, भारत आणि बांग्लादेश यांच्यातील टी-२० मालिकेचा पहिला सामना ६ ऑक्टोबरला धरमशालामध्ये खेळवला जाणार होता. मात्र येथे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनला अपग्रेड करण्याचे काम सुरू आहे. याच कारणामुळे पहिला टी-२० सामना ग्वालियरमध्ये शिफ्ट करण्यात आला आहे. ग्वालियरमध्ये श्रीमंत माधवराव सिंधिया स्टेडियम बनून तयार झाला आहे. हे या शहरातील नवे स्टेडियम आहे.

दोन कसोटी आणि तीन टी-२० सामने खेळणार बांगलादेशचा संघ

भारत-बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईमध्ये आणि दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवला जाईल. टी-२० मालिकेतील पहिला सामना ग्वालियरमध्ये ६ ऑक्टोबरला खेळवला जाईल. तर दुसरा सामना दिल्ली आणि तिसरा सामना हैदराबादमध्ये खेळवला जाईल

भारत-इंग्लंड वेळापत्रकात बदल

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेतही बदल झाला आहे. खरंतर, इंग्लंड क्रिकेट संघ जानेवारी २०२५मध्ये भारत दौऱ्यावर येत आहे. येथे ते पाच टी-२- आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामना २२ जानेवारी आणि दुसरा २५ जानेवारीला खेळवला जाणार आहे. पहिला सामना चेन्नई आणि दुसरा सामना कोलकातामध्ये खेळवला जाणार आहे. मात्र आता दोन्ही जागा बदलण्यात आल्या आहेत. आता पहिला सामना कोलकाता आणि दुसरा सामना चेन्नईमध्ये खेळवला जाईल.

Recent Posts

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

37 seconds ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

55 minutes ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

8 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

8 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

9 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

9 hours ago