Bank Job : बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी! SBIमध्ये १०००हून अधिक पदांची मेगाभरती

मुंबई : बँकेत काम (Bank Job) करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) नुकतेच भरतीची अधिसुचना जारी केली आहे. त्यानुसार बँकेत तब्बल १ हजार ३० पदांची भरती घेण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. उमेदवार एसबीआयच्या https://sbi.co.in/web/careers/current-openings या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. तर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ ऑगस्ट असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर पात्र आणि इच्छुकांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.



कोणत्या पदांसाठी भरती?


या भरती मोहिमेद्वारे, बँक व्हीपी वेल्थ रेग्युलरच्या ६०० जागा, रिलेशनशिप मॅनेजर एआरएम रेग्युलरच्या १५० जागा, रिलेशनशिप मॅनेजर एआरएम बॅकलॉगच्या १२३ जागा, व्हीपी वेल्थ बॅकलॉगच्या ४३ जागा, इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट रेग्युलरच्या ३० जागा, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर बॅकलॉगच्या २६ जागा, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर रेग्युलरच्या २३ जागा, रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीड रेग्युलरच्या ११ जागा, रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीड बॅकलॉगच्या ११ जागा भरल्या जातील.


त्याचबरोबर रिजनल हेड बॅकलॉगच्या ४ जागा, रिजनल हेड रेग्युलर, सेंट्रल रिसर्च टीम (प्रोजेक्ट लीड) रेग्युलर, सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) रेग्युलर व प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (बिझनेस) रेग्युलरसाठी प्रत्येकी २ जागांची भरती केली जाणार आहेत. तसेच, मोहिमेद्वारे प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर रेग्युलरसाठी एक जागा भरली जाईल.



अर्ज शुल्क


या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज करणाऱ्या सामान्य/ईडब्ल्यूएस/ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना ७५० रुपये भरावे लागतील. त्याच वेळी, SC, ST आणि अपंग उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना