Share Market: या आठवड्यात शेअर मार्केट ३ दिवस राहणार बंद, या कारणामुळे सुट्टी

मुंबई: जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. या आठवड्यात शेअर मार्केटला तीन दिवसांची सुट्टी असणार आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीशिवाय या आठवड्यात आणखी एक दिवस बाजार बंद असणार आहे.

ऑगस्ट महिना हा सणांचा महिना असतो. त्यामुळे विविध सण या महिन्यात येतात. अशातच या आठवड्यात स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीमुळे बँका तसेच शेअर बाजारातही सुट्टी असणार आहे.

१५ ऑगस्टला बंद मार्केट


या आठवड्यात गुरूवारी संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. अशातच संपूर्ण देशात या राष्ट्रीय पर्वाच्या निमित्ताने सुट्टी असेल. बँका आणि शाळांसोबत शेअर मार्केटही बंद असेल. स्वातंत्र्यदिनानिमित्त मार्केट बंद असल्याकारणाने इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव, एसएलबी, करेन्सी डेरिव्हेटिव्ह आणि इंटरेस्ट डेरव्हेटिव्हा मार्केट बंद असेल.

या दिवशी शेअर मार्केट बंद


१५ ऑगस्ट गुरूवार- स्वातंत्र्य दिन

१७ ऑगस्ट शनिवार- साप्ताहिक सुट्टी

१८ ऑगस्ट रविवार - साप्ताहिक सुट्टी
Comments
Add Comment

Harihareshwar येथे खगोल दर्शन महोत्सव

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन, पर्यटन

Eknath Shinde : 'गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करा'

मुंबई : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करून टप्पा दोन बाबतचा

Governor of Maharashtra : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स स्थापन करा, राज्यपालांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्व कृषि विद्यापीठात कृषी उत्पादन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५०

AI च्या मदतीने दूध भेसळ रोखण्यासाठी IIT ची मदत घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई : राज्यात दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने टेस्ट स्ट्रीप तयार केली

hydroelectric project : उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्थेबरोबर ५ हजार २०० कोटींचा करार

मुंबई : जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्था मर्यादित यांच्यात मुख्यमंत्री

Panvel : पनवेलच्या आदई-नेवाळी दगडखाणीबाबत गावकऱ्यांच्या विश्वासाने तोडगा काढणार

मुंबई : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातल्या आदई आणि नेवाळी येथील दगडखाणींमुळे स्थानिक ग्रामस्थांना