नवी दिल्ली : बांगलादेशात सध्या गृहयुद्ध भडकले आहे. अनेक बांगलादेशी नागरिक भारताच्या हद्दीत येण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day) दिल्लीत हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
दिल्लीच्या पोलीस मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमधील परिस्थिती बघता दिल्ली एनसीआरमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बैठकीत चर्चा झाली. यानंतर दिल्ली पोलिसांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश देण्यात आले.
स्पेशल सेल, क्राईम ब्रान्च आणि जिल्हा पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. यावेळी पोलीस आयुक्तांनी दिल्लीत राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची यादी बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची स्वतंत्र यादी बनवण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरयाणा राज्याचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…