Bihar: जहानाबाद येथील सिद्धेश्वर मंदिरात चेंगराचेंगरीमध्ये ७ जणांचा मृत्यू, श्रावण सोमवारनिमित्त झाली होती गर्दी

पाटणा: बिहारच्या जहानाबाद-मखदुमपूर येथील सिद्धेश्वर मंदिरात सोमवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये पाच महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.


श्रावण महिन्यातील सोमवार असल्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने भक्तगण जमले होते. मंदिरात भक्तगणांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांच्या माहितीनुसार श्रावणातील तिसऱ्या सोमवारनिमित्ताने अनेक भाविक या ठिकाणी शिवलिंगावर जलाभिषेक करण्यासाठी आले होते. यावेळी प्रचंड गर्दी असल्याने चेंगराचेंगरी झाली. रांगेत उभ्या असलेल्या भक्तांमध्ये धक्काबुक्कीमुळे रेलिंग तुटली आणि हा अपघात झाला.


चेंगराचेंगरी झाल्याची सूचना मिळताच ड्रिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवली जात आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झालेत.


याआधी २ जुलैला उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल १२० जणांचा मृत्यू झाला होता. ही चेंगराचेंगरी बाबा नारायण हरी यांच्या कार्यक्रमादरम्यान झाली होती.

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीसह देशातील वीस मुलांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील वीस मुलांना

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारची डीएसपींना धडक

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील एका

राष्ट्रपती मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार आहेत. नियोजीत कार्यक्रमानुसार राष्ट्रपती

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले