Bihar: जहानाबाद येथील सिद्धेश्वर मंदिरात चेंगराचेंगरीमध्ये ७ जणांचा मृत्यू, श्रावण सोमवारनिमित्त झाली होती गर्दी

  120

पाटणा: बिहारच्या जहानाबाद-मखदुमपूर येथील सिद्धेश्वर मंदिरात सोमवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये पाच महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.


श्रावण महिन्यातील सोमवार असल्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने भक्तगण जमले होते. मंदिरात भक्तगणांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांच्या माहितीनुसार श्रावणातील तिसऱ्या सोमवारनिमित्ताने अनेक भाविक या ठिकाणी शिवलिंगावर जलाभिषेक करण्यासाठी आले होते. यावेळी प्रचंड गर्दी असल्याने चेंगराचेंगरी झाली. रांगेत उभ्या असलेल्या भक्तांमध्ये धक्काबुक्कीमुळे रेलिंग तुटली आणि हा अपघात झाला.


चेंगराचेंगरी झाल्याची सूचना मिळताच ड्रिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवली जात आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झालेत.


याआधी २ जुलैला उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल १२० जणांचा मृत्यू झाला होता. ही चेंगराचेंगरी बाबा नारायण हरी यांच्या कार्यक्रमादरम्यान झाली होती.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या