Bihar: जहानाबाद येथील सिद्धेश्वर मंदिरात चेंगराचेंगरीमध्ये ७ जणांचा मृत्यू, श्रावण सोमवारनिमित्त झाली होती गर्दी

पाटणा: बिहारच्या जहानाबाद-मखदुमपूर येथील सिद्धेश्वर मंदिरात सोमवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये पाच महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.


श्रावण महिन्यातील सोमवार असल्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने भक्तगण जमले होते. मंदिरात भक्तगणांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांच्या माहितीनुसार श्रावणातील तिसऱ्या सोमवारनिमित्ताने अनेक भाविक या ठिकाणी शिवलिंगावर जलाभिषेक करण्यासाठी आले होते. यावेळी प्रचंड गर्दी असल्याने चेंगराचेंगरी झाली. रांगेत उभ्या असलेल्या भक्तांमध्ये धक्काबुक्कीमुळे रेलिंग तुटली आणि हा अपघात झाला.


चेंगराचेंगरी झाल्याची सूचना मिळताच ड्रिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवली जात आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झालेत.


याआधी २ जुलैला उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल १२० जणांचा मृत्यू झाला होता. ही चेंगराचेंगरी बाबा नारायण हरी यांच्या कार्यक्रमादरम्यान झाली होती.

Comments
Add Comment

Rinku Singh Century : दांडपट्ट्यागत बॅट फिरवली, ११ चौकार अन् षटकारांच्या मदतीने रिंकू सिंगचं रणजी ट्रॉफीत 'वादळी' शतक!

कानपूर : रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) २०२५-२६ हंगामाला जोरदार सुरुवात झाली असून, उत्तर प्रदेशचा स्टार फलंदाज रिंकू सिंग याने

Garib Rath Express Fire : गरीब रथ एक्सप्रेसला अचानक आग! 'ज्वाळा' पाहून प्रवाशांना फुटला घाम; अनेकजण जखमी, रेल्वेने दिली 'ही' माहिती

अमृतसर : पंजाबमधील सरहिंद रेल्वे स्टेशनजवळ आज, शनिवारी, सकाळी अचानक मोठा गोंधळ आणि अफरातफरी माजली. लुधियानाहून

Dhanvantari Temples : धनत्रयोदशीला कोणत्या मंदिरात पूजा करावी? जाणून घ्या भारतातील ६ धन्वंतरी मंदिरं, जिथे पूर्ण होतात धनाच्या सर्व इच्छा

'धनत्रयोदशी' किंवा धनतेरस हा सण दिवाळी उत्सवाचा प्रारंभ मानला जातो. या शुभदिनी लोक सोने-चांदी, नवीन भांडी, वाहने

'अत्याधुनिक विमानाचे उड्डाण हे भारताच्या आत्मनिर्भरतेचे झळाळते प्रतीक', संरक्षणमंत्र्यांचे गौरवोद्गार

नाशिक: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नाशिक येथील कारखान्यात हलक्या लढाऊ विमानाच्या 'तेजस एमके 1 ए' च्या

मुंबईत जलवाहतुकीत नवी क्रांती! ना लाटांचे धक्के, ना आवाज मुंबईत येतेय भविष्याची ‘कॅन्डेला’ बोट

कॅन्डेला कंपनीच्या नवीन तंत्रज्ञानाने युक्त बोटी लवकरच मुंबईच्या जलवाहतूक क्षेत्रात दाखल होणार आहेत.

PM Modi on Naxalites : आता तो दिवस दूर नाही…"नक्षलवाद संपणार, हीच मोदीची गॅरंटी!" पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य, 'आनंदाचे दिवे लखलखतील'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माओवादी (Maoism) दहशतवादामुळे झालेल्या नुकसानीबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत, या भागातील