Paris Olympics 2024: ५ जणांवर खर्च झाले २० कोटी, एकानेच मिळवले पदक

  67

मुंबई: भारताने पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये एकूण ६ पदके जिंकली. टोकियो ऑलिम्पिकच्या तुलनेत पदकांची संख्या कमी झाली. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ७ पदके जिंकली होती. ऑलिम्पिकच्या इतिहासातील त्यांचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन होते.


यंदाच्या वर्षी ११९ भारतीय खेळाडूंचे दल पॅरिसला पोहोचले होते. यात नेमबाज मनू भाकरने दोन पदके मिळवली होती. या खेळाडूंपैकी ५ खेळाडूंवर सरकारने सर्वाधिक पैसे खर्च केले होते. यात नीरज चोप्रा, मीराबाई चानू, पीव्ही सिंधू, सात्विक-चिराग आणि अनीश भानवाला यांचा समावेश होता.


या खेळाडूंच्या तयारीसाठी सरकारने कोट्यावधी रूपये खर्च केले मात्र यातील नीरज चोप्राला या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवता आले. त्याने भारताला रौप्य पदक मिळवून दिले.


भारतीय अॅथलेटिक्सचा पोस्टर बॉय नीरज चोप्रावर ५.८२ कोटी खर्च करण्यात आले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये रौप्य पदक आपल्या नावे केले. अॅथलेटिक्समद्ये सलग दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारा नीरज पहिला भारतीय ठरला. नीरजने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ८९.४५ मीटर थ्रो करत दुसऱ्या स्थानावर राहिला तर पाकिस्तानचा अर्शद नदीम ९२.९७ मीटर थ्रो करत पहिले स्थान मिळवले.



बॅडमिंटनपटू चिराग-सात्विक जोडीवर खर्च झाले ५.६२ कोटी


बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीकडून पॅरिसमध्ये पदकाची अपेक्षा होती. मात्र या जोडीने निराश केले. दोन्ही खेळाडूंवर ५.६२ कोटी रूपये खर्च केले होते. मात्र भारतीय जोडीला पुरुष वर्गात क्वार्टरफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूकडून पॅरिसमध्ये सलग तिसरे पदक जिंकण्याची अपेक्षा होती. मात्र तिनेही निराश केले. त्यांच्यावर ३.१३ कोटी खर्च करण्यात आले होते.



मीराबाई चानूला चौथा नंबर


वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू चौथ्या स्थानावर राहिले. तिने टोकियोमध्ये रौप्य पदक जिंकले होते. पॅरिसमध्ये तिच्याकडून रौप्य अथवा कांस्य पदकाची अपेक्षा होती. मात्र ती पदक जिंकण्यात अय़शस्वी ठरली. मीराबाईवर २.७४ कोटी खर्च करण्यात आले होते.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार