Raigad News : रायगडमध्ये लंपीचे थैमान! ७० ते ८० जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव

  83

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ


खालापूर : गत वर्षी संपूर्ण राज्यात 'लंपी' (Lumpy Disease) या जनावरांच्या रोगाने थैमान घातले होते. त्यामुळे पशू संवर्धन विभाग (Animal Husbandry Department) महाराष्ट्र शासन यांनी उपाययोजना करून राज्यभरात लंपी प्रतिरोधक लसीकरण करून याचा बंदोबस्त केला होता. मात्र त्यानंतर आता पुन्हा लंपी आजाराने डोके वर काढले आहे. रायगडमध्ये (Raigad) लंपी आजाराने थैमान घातले आहे. अनेक जनावरांना या रोगाने ग्रासले आहे. परंतु या प्रकरणाबाबत प्रशासनकडून गंभीर दखल घेतली जात नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील करबेली ठाकूरवाडी येथे जवळपास ८० ते ९० कुटुंबं वास्तव्यास आहेत. येथील आदिवासी समाजाची उपजीविका या पशुधनावर आधारित आहे. अंदाजे ३०० ते ४०० पशुधन सद्यस्थितीत ठाकूरवाडी येथे आहे. परंतु आतापर्यंत याठिकाणी जवळपास ७० ते ८० जनावरांना या लंपी रोगाची लागण झाली. तर काही जनावरे मरण पावल्यामुळे येथील आदिवासी आपले पशुधन कसे वाचेल या चिंतेत पडले आहेत.


दरम्यान, लंपीचे वाढते प्रकरण पाहता प्रशासन या घटनेकडे दुर्लक्ष करत आहे. याबाबत स्थानिकांनी संबंधित विभागाशी संपर्क केला असता, 'आम्ही खाजगी माणूस पाठवतो. त्यांच्याकडून लसीकरण करून घ्या आणि त्यांना लसीकरणचे पैसे द्या' असे सांगितले जाते. पण प्रशासकीय यंत्रणा असूनही खाजगी डॉक्टरांकडून लसीकरण करून का घ्यावे? असा प्रश्न येथील आदिवासी बांधव यांना पडला आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत