Raigad News : रायगडमध्ये लंपीचे थैमान! ७० ते ८० जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ


खालापूर : गत वर्षी संपूर्ण राज्यात 'लंपी' (Lumpy Disease) या जनावरांच्या रोगाने थैमान घातले होते. त्यामुळे पशू संवर्धन विभाग (Animal Husbandry Department) महाराष्ट्र शासन यांनी उपाययोजना करून राज्यभरात लंपी प्रतिरोधक लसीकरण करून याचा बंदोबस्त केला होता. मात्र त्यानंतर आता पुन्हा लंपी आजाराने डोके वर काढले आहे. रायगडमध्ये (Raigad) लंपी आजाराने थैमान घातले आहे. अनेक जनावरांना या रोगाने ग्रासले आहे. परंतु या प्रकरणाबाबत प्रशासनकडून गंभीर दखल घेतली जात नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील करबेली ठाकूरवाडी येथे जवळपास ८० ते ९० कुटुंबं वास्तव्यास आहेत. येथील आदिवासी समाजाची उपजीविका या पशुधनावर आधारित आहे. अंदाजे ३०० ते ४०० पशुधन सद्यस्थितीत ठाकूरवाडी येथे आहे. परंतु आतापर्यंत याठिकाणी जवळपास ७० ते ८० जनावरांना या लंपी रोगाची लागण झाली. तर काही जनावरे मरण पावल्यामुळे येथील आदिवासी आपले पशुधन कसे वाचेल या चिंतेत पडले आहेत.


दरम्यान, लंपीचे वाढते प्रकरण पाहता प्रशासन या घटनेकडे दुर्लक्ष करत आहे. याबाबत स्थानिकांनी संबंधित विभागाशी संपर्क केला असता, 'आम्ही खाजगी माणूस पाठवतो. त्यांच्याकडून लसीकरण करून घ्या आणि त्यांना लसीकरणचे पैसे द्या' असे सांगितले जाते. पण प्रशासकीय यंत्रणा असूनही खाजगी डॉक्टरांकडून लसीकरण करून का घ्यावे? असा प्रश्न येथील आदिवासी बांधव यांना पडला आहे.

Comments
Add Comment

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या