Himachal Rain : हिमाचलमध्ये ढगफुटीसह भूकंपाचे धक्के! पुरामुळे जनजीवन विस्कळीत; २८ जणांचा मृत्यू

हवामान विभागाकडून अलर्ट जारी


शिमला : मागील आठवड्यात संपूर्ण राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्या तुलनेत या आठवड्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली. मात्र अनेक भागांत पावसाची रिपरिप सुरुच असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच हिमाचल प्रदेशात पावसाने धुमाकूळ (Himachal Rain) घातला आहे. याठिकाणी पावसाची संततधार सुरु असल्यामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात साचले आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून २८ जणांचा मृत्यू झाल्याची देखील बातमी मिळत आहे. एकीकडे मुसळधार तर दुसरीकडे भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे हिमाचलमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


हिमाचल प्रदेशासह उत्तर प्रदेशात कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हिमाचलमधील रक्कड कॉलनीत पावसाचे पाणी शिरले. यामुळे नागरिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील गंगा नदीसह इतर नद्यांच्या पाणीपातळीतही लक्षणीय वाढ झाल्यामुळे हवामान विभागाने (IMD) या भागात अलर्ट जारी केला.



हिमाचलमध्ये तीन वेळा जाणवले भूकंपाचे धक्के


हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि ढगफुटीच्या घटनेनंतर भूकंपाचे धक्के बसले आहेत. या ठिकाणी झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.३ इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू मंडी येथे होता. भूकंपाचे धक्के तीन वेळा जाणवले असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Comments
Add Comment

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१