Airtel, jioला फुटला घाम, १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीत BSNLने आणला प्लान

मुंबई: सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल वेगाने आपल्या सेवेत सुधारणा करत आहे. देशात नुकतेच प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लान्समध्ये वाढ केली आहे.यामुळे अनेकांनी बीएसएनएलची वाट धरली. तर बीएसएनएलकडे एक जबरदस्त प्लान आहे जो १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीत दोन महिन्यांच्या व्हॅलिडिटीसह येतो.

९१ रूपयांचा प्लान


बीएसएनएल इतर प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत लोकांना कमी किंमतीत अधिक फायदे देते. अशातच जर तुम्हाला कमी खर्चात तुमचे सिमकार्ड अधिक काळ अॅक्टिव्ह ठेवायचे असेल तर बीएसएनएलचा ९१ रूपयांचा प्रीपेड प्लान चांगला आहे.

याशिवाय बीएसएनएलच्या या प्लानमध्ये लोकांना कॉलिंगची सुविधाही मिळते. दरम्यान, डेटा म्हणजेच इंटरनेटची सुविधा यात नाही. इंटरनेटसाठी तुम्हाला एक्सट्रा चार्ज द्यावे लागतील. तर या प्लानमध्ये १५ पैसे प्रति मिनिट दराने कॉलिंगची सुविधा मिळते.

२५ रूपये प्रति एसएमएससाठी द्यावे लागतात. जर तुम्ही या प्लानमध्ये इंटरनेटचा वापर करत आहात तर तुम्हाला १ पैसा प्रति एमबीवर द्यावा लागेल.

BSNLचा इंटरनेट प्लानही स्वस्त


बीएसएनएचा १८७ रूपयांचा प्रीपेड प्लानही अतिशय चांगला आहे. या प्लानमध्ये युजर्सला २ जीबी डेटा दिवसाला दिला जातो. याशिवाय लोकांना यात अनलिमिटेड कॉलिंगसोबतच १०० एसएमएस प्रति दिवसाला दिले जातात. हा प्लान २८ दिवसांसाठी व्हॅलिड आहे. या हिशेबाने पाहिल्यास बीएसएनएलचा हा प्लान इतर कंपन्यांच्या तुलनेत अतिशय स्वस्त आहे.
Comments
Add Comment

अरबी शिकवणाऱ्या व्यक्तीवर अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई: अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपाखाली मुंबई पोलिसांनी शिवडी येथील एका धार्मिक संस्थेतून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सोयी-सुविधांची कमतरता नको!

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा

डिसेंबर २०२८ नंतर सिग्नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय होणार प्रवास, महापालिकेच्या या प्रकल्पाची वाढतेय गती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्‍यान नवीन जोडमार्ग स्‍थापित होत आहे. पश्चिमेकडील

मुंबईत चार नवीन कबूतर खाने, पण बाकीचे बंद म्हणजे बंदच....

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील विद्यमान कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान,

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

मुंबई : पवईतील स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक