Airtel, jioला फुटला घाम, १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीत BSNLने आणला प्लान

मुंबई: सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल वेगाने आपल्या सेवेत सुधारणा करत आहे. देशात नुकतेच प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लान्समध्ये वाढ केली आहे.यामुळे अनेकांनी बीएसएनएलची वाट धरली. तर बीएसएनएलकडे एक जबरदस्त प्लान आहे जो १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीत दोन महिन्यांच्या व्हॅलिडिटीसह येतो.

९१ रूपयांचा प्लान


बीएसएनएल इतर प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत लोकांना कमी किंमतीत अधिक फायदे देते. अशातच जर तुम्हाला कमी खर्चात तुमचे सिमकार्ड अधिक काळ अॅक्टिव्ह ठेवायचे असेल तर बीएसएनएलचा ९१ रूपयांचा प्रीपेड प्लान चांगला आहे.

याशिवाय बीएसएनएलच्या या प्लानमध्ये लोकांना कॉलिंगची सुविधाही मिळते. दरम्यान, डेटा म्हणजेच इंटरनेटची सुविधा यात नाही. इंटरनेटसाठी तुम्हाला एक्सट्रा चार्ज द्यावे लागतील. तर या प्लानमध्ये १५ पैसे प्रति मिनिट दराने कॉलिंगची सुविधा मिळते.

२५ रूपये प्रति एसएमएससाठी द्यावे लागतात. जर तुम्ही या प्लानमध्ये इंटरनेटचा वापर करत आहात तर तुम्हाला १ पैसा प्रति एमबीवर द्यावा लागेल.

BSNLचा इंटरनेट प्लानही स्वस्त


बीएसएनएचा १८७ रूपयांचा प्रीपेड प्लानही अतिशय चांगला आहे. या प्लानमध्ये युजर्सला २ जीबी डेटा दिवसाला दिला जातो. याशिवाय लोकांना यात अनलिमिटेड कॉलिंगसोबतच १०० एसएमएस प्रति दिवसाला दिले जातात. हा प्लान २८ दिवसांसाठी व्हॅलिड आहे. या हिशेबाने पाहिल्यास बीएसएनएलचा हा प्लान इतर कंपन्यांच्या तुलनेत अतिशय स्वस्त आहे.
Comments
Add Comment

मालाड आणि गोरेगावमधील दोन मनोरंजन मैदानांचा होणार विकास

गोरेगाव पहाडीतील मोकळ्या जागेवर उभारले जाणार मनोरंजन मैदान सरदार वल्लभभाई मनोरंजन मैदानाचे होणार

प्रारुप मतदार यादीवर हरकती, सूचना नोंदवण्यास मुदतवाढ

हरकती आता ३ डिसेंबर २०२५ पर्यंत नोंदवता येणार मागील सात दिवसांत २१६७ हरकती, सूचना नोंदवल्या मुंबई (विशेष

शक्ती वाघाचा मृत्यू न्युमोनियामुळे, शव विच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून माहिती समोर

आता राणीबागेत जय आणि करिष्मा वाघाला पाहता येणार मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा (पूर्व)

अतिवृष्टीचे संकट, पण सरकारचा आधार; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला एक वर्षाची स्थगिती

मुंबई : राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली

येत्या ३ आणि ४ डिसेंबरला अर्ध्या मुंबईत १५ टक्के पाणीकपात

मुंबई : भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याने

विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी ब्लॅकमेलिंग करणारा तरुण अटकेत

मुंबई : एका तरुणाने मॉर्फ छायाचित्रे व्हायरल करण्याच्या दिलेल्या धमकीनंतर कुटुंबाची बदनामी होईल, या भीतीने