Airtel, jioला फुटला घाम, १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीत BSNLने आणला प्लान

मुंबई: सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल वेगाने आपल्या सेवेत सुधारणा करत आहे. देशात नुकतेच प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लान्समध्ये वाढ केली आहे.यामुळे अनेकांनी बीएसएनएलची वाट धरली. तर बीएसएनएलकडे एक जबरदस्त प्लान आहे जो १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीत दोन महिन्यांच्या व्हॅलिडिटीसह येतो.

९१ रूपयांचा प्लान


बीएसएनएल इतर प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत लोकांना कमी किंमतीत अधिक फायदे देते. अशातच जर तुम्हाला कमी खर्चात तुमचे सिमकार्ड अधिक काळ अॅक्टिव्ह ठेवायचे असेल तर बीएसएनएलचा ९१ रूपयांचा प्रीपेड प्लान चांगला आहे.

याशिवाय बीएसएनएलच्या या प्लानमध्ये लोकांना कॉलिंगची सुविधाही मिळते. दरम्यान, डेटा म्हणजेच इंटरनेटची सुविधा यात नाही. इंटरनेटसाठी तुम्हाला एक्सट्रा चार्ज द्यावे लागतील. तर या प्लानमध्ये १५ पैसे प्रति मिनिट दराने कॉलिंगची सुविधा मिळते.

२५ रूपये प्रति एसएमएससाठी द्यावे लागतात. जर तुम्ही या प्लानमध्ये इंटरनेटचा वापर करत आहात तर तुम्हाला १ पैसा प्रति एमबीवर द्यावा लागेल.

BSNLचा इंटरनेट प्लानही स्वस्त


बीएसएनएचा १८७ रूपयांचा प्रीपेड प्लानही अतिशय चांगला आहे. या प्लानमध्ये युजर्सला २ जीबी डेटा दिवसाला दिला जातो. याशिवाय लोकांना यात अनलिमिटेड कॉलिंगसोबतच १०० एसएमएस प्रति दिवसाला दिले जातात. हा प्लान २८ दिवसांसाठी व्हॅलिड आहे. या हिशेबाने पाहिल्यास बीएसएनएलचा हा प्लान इतर कंपन्यांच्या तुलनेत अतिशय स्वस्त आहे.
Comments
Add Comment

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात मुंबई पुष्पोत्सवाचा शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई पुष्पोत्सवाप्रमाणेच येत्या काळात पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही पुष्पोत्सव सुरू

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला दिला पाठिंबा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव नगरसेवक निवडून आला असून या नगरसेवकानेही आता

राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी

प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक ७/१२ आणि नकाशांचा मेळ बसणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी, ६ फेब्रुवारी २०२६

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस