Airtel, jioला फुटला घाम, १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीत BSNLने आणला प्लान

  745

मुंबई: सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल वेगाने आपल्या सेवेत सुधारणा करत आहे. देशात नुकतेच प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लान्समध्ये वाढ केली आहे.यामुळे अनेकांनी बीएसएनएलची वाट धरली. तर बीएसएनएलकडे एक जबरदस्त प्लान आहे जो १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीत दोन महिन्यांच्या व्हॅलिडिटीसह येतो.

९१ रूपयांचा प्लान


बीएसएनएल इतर प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत लोकांना कमी किंमतीत अधिक फायदे देते. अशातच जर तुम्हाला कमी खर्चात तुमचे सिमकार्ड अधिक काळ अॅक्टिव्ह ठेवायचे असेल तर बीएसएनएलचा ९१ रूपयांचा प्रीपेड प्लान चांगला आहे.

याशिवाय बीएसएनएलच्या या प्लानमध्ये लोकांना कॉलिंगची सुविधाही मिळते. दरम्यान, डेटा म्हणजेच इंटरनेटची सुविधा यात नाही. इंटरनेटसाठी तुम्हाला एक्सट्रा चार्ज द्यावे लागतील. तर या प्लानमध्ये १५ पैसे प्रति मिनिट दराने कॉलिंगची सुविधा मिळते.

२५ रूपये प्रति एसएमएससाठी द्यावे लागतात. जर तुम्ही या प्लानमध्ये इंटरनेटचा वापर करत आहात तर तुम्हाला १ पैसा प्रति एमबीवर द्यावा लागेल.

BSNLचा इंटरनेट प्लानही स्वस्त


बीएसएनएचा १८७ रूपयांचा प्रीपेड प्लानही अतिशय चांगला आहे. या प्लानमध्ये युजर्सला २ जीबी डेटा दिवसाला दिला जातो. याशिवाय लोकांना यात अनलिमिटेड कॉलिंगसोबतच १०० एसएमएस प्रति दिवसाला दिले जातात. हा प्लान २८ दिवसांसाठी व्हॅलिड आहे. या हिशेबाने पाहिल्यास बीएसएनएलचा हा प्लान इतर कंपन्यांच्या तुलनेत अतिशय स्वस्त आहे.
Comments
Add Comment

राज्यात २४ तास वाळू वाहतुकीला परवानगी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यात वाळू वाहतुकीसंदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई : भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

Chandrashekhar Bawankule : भूमी गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन! महसूल मंत्री बावनकुळेंची विधानसभेत घोषणा

आठ मुद्रांक अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत मुंबई : नाशिक जिल्ह्यातील संगमेश्वर येथील भूमाफियांनी केलेल्या

राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक

मुंबईत सर्वाधिक, तर पुण्यात संख्येत घट मुंबई : कधीकाळी कुपोषित बालकांचा जिल्हा अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक