Paris Olympic 2024: भारताला मिळाले सहावे पदक, अमन सहरावतने कुस्तीमध्ये जिंकले कांस्यपदक

मुंबई: पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये भारताने सहावे पदक मिळवले आहे. अमन सहरावतने पुरूषांच्या ५७ किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली. त्याने प्युर्टो रिकोच्या डारियन क्रूझला १३-५ असे हरवले. हे भारताचे पॅरिस ऑलिम्पिक २०२४मधील हे सहावे पदक आहे. भारताने आतापर्यंत या ऑलिम्पिकमध्ये एक रौप्य आणि ५ कांस्यपदक जिंकले आहेत.


अमन सहरावत या कुस्तीमध्ये सुरूवातीपासूनच वरचढ ठरला होता. प्रतिस्पर्धी कुस्तीपटूने एकवेळ ३-२ अशी आघाडी घेत रंगत आणली मात्र त्यानंतर अमनने जबरदस्त कमबॅक करत कुस्ती जिंकली.



१६ वर्षांची परंपरा राखली कायम


भारत २००८ बीजिंग ऑलिम्पिकपासून कुस्तीमध्ये नेहमीच ऑलिम्पिक पदक जिंकत आलेला आहे. २००८मध्ये सुशील कुमारने कांस्यपदक जिंकत इतिहास रचला होता. सुशीलने त्यानंतर २०१२मध्ये आपल्या पदकाचा रंग बदलत रौप्यपदक जिंकले होते. त्याच वर्षी योगेश्वर दत्तने कांस्यपदकाची कमाई केली होती. २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने कांस्यपदक जिंकत तिरंगा फडकावला होता. तर २०२०मध्ये रवी दहिया आणि बजरंग पुनियाने तर आता अमन सेहरावतने ही परंपरा कायम राखली.

२००८ बीजिंग ऑलिम्पिक - सुशील कुमार(कांस्य पदक)

२०१३ लंडन ऑलिम्पिक - सुशील कुमार(रौप्य पदक), योगेश्वर दत्त(कांस्य)

२०१६ रिओ ऑलिम्पिक - साक्षी मलिक(कांस्यपदक)

२०२० टोकियो ऑलिम्पिक - रवी दहिया(रौप्य पदक), बजरंग पुनिया(कांस्य)

२०२४ पॅरिस ऑलिम्पिक - अमन सहरावत(कांस्यपदक)
Comments
Add Comment

New AC Local : २०२९-३० पर्यंत मुंबईच्या सर्व लोकल एसी होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; द्वितीय श्रेणीचे तिकीट वाढवणार नाही मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेचे

GeM : जेमच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची दुहेरी बाजी; पंचायतस्तरीय खरेदीतील उत्कृष्टतेसह सर्वाधिक खरेदी मूल्यासाठी महाराष्ट्राचा गौरव

मुंबई : शासकीय ई-बाजारपेठ अर्थात जेमच्या दशकपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित ‘हॉनरिंग एक्सलन्स’ पुरस्कार

One-day Seminar : ‘पडद्यावरचा सिनेमा, पडद्यामागचं गणित’ या विषयावर रंगणार एकदिवसीय परिसंवाद

महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्याची मंत्रालयात रंगीत तालीम

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५ ऑगस्टला होणार ध्वजारोहण मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या

Uday Samant : चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी १६ ऑगस्टला प्रत्यक्ष बैठक घेणार; मंत्री उदय सामंत

मुंबई : चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये विविध

Independence Day 2026 : महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष! जाणून घ्या मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत कुठे कोण फडकवणार तिरंगा?

मुंबई : भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी देशभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.