अत्तराच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूरच्या इतवारी परिसरातील खापरपुरा येथील अत्तराच्या गोदामाला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आली. मात्र यामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण बाखडे यांचे इतवारीतील खापरीपुरा परिसरात रेणुका नॉव्हेल्टी नावाचे दुकान आहे. त्याचठिकाणी ते कुटुंबासह राहतात. आज पहाटे संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना तळमजल्यावरील गोदामात शॉटसर्किट झाला. गोदामात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या वस्तू असल्याने शॉटसर्किटने आगीचे रुप धारण केले. ही आग इतकीभीषण होती की काहीवेळातच आगीने संपूर्ण इमारतीला वेढले. आग पाहताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी आठ गाड्यांसह घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्यास सुरुवात केली. गोदामात प्लॅस्टिकच्या वस्तू असल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यात आणि आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र अथक प्रयत्न करुन दलाने अडकलेल्या चार जणांना बाहेर काढले.



जखमींची माहिती


या घटनेत प्रवीण बाखडे (४०), त्यांची पत्नी प्रीती बाखडे (३७), मुलगी अनुष्का बाखडे (१७) आणि मुलगा सार्थक बाखडे (१५) हे गंभीर जखमी झाले, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान अनुष्काचा मृत्यू झाला तर बाखडे पती-पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये