अत्तराच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूरच्या इतवारी परिसरातील खापरपुरा येथील अत्तराच्या गोदामाला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आली. मात्र यामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण बाखडे यांचे इतवारीतील खापरीपुरा परिसरात रेणुका नॉव्हेल्टी नावाचे दुकान आहे. त्याचठिकाणी ते कुटुंबासह राहतात. आज पहाटे संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना तळमजल्यावरील गोदामात शॉटसर्किट झाला. गोदामात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या वस्तू असल्याने शॉटसर्किटने आगीचे रुप धारण केले. ही आग इतकीभीषण होती की काहीवेळातच आगीने संपूर्ण इमारतीला वेढले. आग पाहताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी आठ गाड्यांसह घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्यास सुरुवात केली. गोदामात प्लॅस्टिकच्या वस्तू असल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यात आणि आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र अथक प्रयत्न करुन दलाने अडकलेल्या चार जणांना बाहेर काढले.



जखमींची माहिती


या घटनेत प्रवीण बाखडे (४०), त्यांची पत्नी प्रीती बाखडे (३७), मुलगी अनुष्का बाखडे (१७) आणि मुलगा सार्थक बाखडे (१५) हे गंभीर जखमी झाले, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान अनुष्काचा मृत्यू झाला तर बाखडे पती-पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा