अत्तराच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

  80

नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूरच्या इतवारी परिसरातील खापरपुरा येथील अत्तराच्या गोदामाला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आली. मात्र यामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण बाखडे यांचे इतवारीतील खापरीपुरा परिसरात रेणुका नॉव्हेल्टी नावाचे दुकान आहे. त्याचठिकाणी ते कुटुंबासह राहतात. आज पहाटे संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना तळमजल्यावरील गोदामात शॉटसर्किट झाला. गोदामात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या वस्तू असल्याने शॉटसर्किटने आगीचे रुप धारण केले. ही आग इतकीभीषण होती की काहीवेळातच आगीने संपूर्ण इमारतीला वेढले. आग पाहताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी आठ गाड्यांसह घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्यास सुरुवात केली. गोदामात प्लॅस्टिकच्या वस्तू असल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यात आणि आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र अथक प्रयत्न करुन दलाने अडकलेल्या चार जणांना बाहेर काढले.



जखमींची माहिती


या घटनेत प्रवीण बाखडे (४०), त्यांची पत्नी प्रीती बाखडे (३७), मुलगी अनुष्का बाखडे (१७) आणि मुलगा सार्थक बाखडे (१५) हे गंभीर जखमी झाले, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान अनुष्काचा मृत्यू झाला तर बाखडे पती-पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, एसटी साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणार...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना