अत्तराच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

  72

नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूरच्या इतवारी परिसरातील खापरपुरा येथील अत्तराच्या गोदामाला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आली. मात्र यामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण बाखडे यांचे इतवारीतील खापरीपुरा परिसरात रेणुका नॉव्हेल्टी नावाचे दुकान आहे. त्याचठिकाणी ते कुटुंबासह राहतात. आज पहाटे संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना तळमजल्यावरील गोदामात शॉटसर्किट झाला. गोदामात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या वस्तू असल्याने शॉटसर्किटने आगीचे रुप धारण केले. ही आग इतकीभीषण होती की काहीवेळातच आगीने संपूर्ण इमारतीला वेढले. आग पाहताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी आठ गाड्यांसह घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्यास सुरुवात केली. गोदामात प्लॅस्टिकच्या वस्तू असल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यात आणि आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र अथक प्रयत्न करुन दलाने अडकलेल्या चार जणांना बाहेर काढले.



जखमींची माहिती


या घटनेत प्रवीण बाखडे (४०), त्यांची पत्नी प्रीती बाखडे (३७), मुलगी अनुष्का बाखडे (१७) आणि मुलगा सार्थक बाखडे (१५) हे गंभीर जखमी झाले, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान अनुष्काचा मृत्यू झाला तर बाखडे पती-पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन