Almomds Vs walnuts: अक्रोड की बदाम? कोणते ड्रायफ्रुट आहे अधिक फायदेशीर

  107

मुंबई: ड्रायफ्रुट्स हा पोषणतत्वांचा खजाना मानला जातो. काजू, पिस्ता, बदाम, अक्रोड खाण्यासाठी जितके स्वादिष्ट असतात तितकेच फायदेशीरही असतात. अनेकदा म्हटले जाते की बदाम आणि अक्रोड खाल्ल्याने मेंदूची ताकद वाढते. दोन्ही सुकामेव्यामध्ये मानसिक आरोग्यासह शारिरीक विकासाला फायदेशीर ठरणारे घटक आहेत. दरम्यान, अनेकदा लोकांच्या मनात हा सवाल येतो की अक्रोड की बदाम यापेक्षा अधिक फायदेशीर काय आहे.



अक्रोडचे फायदे


हे ड्रायफ्रुट मेंदूच्या आकाराचे असते. हे खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली होती. यात कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, मँगनीज, कॉपर, मॅग्नेशियम सारखी पोषकतत्वे आहेत. यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. अस्थमा रोखणयासाठी, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच शरीरासाठी फायदेशीर असते.



बदामाचे फायदे


रात्री बदाम भिजत घालून सकाळी साले काढून खाल्ल्यास त्याचे शरीरास अनेक फायदे मिळतात. बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते. यात प्रोटीन, फॅट, व्हिटामिन आणि मिनरल्स आढळतात. यामुळे शरीराला आजारापासून दूर रोखता येते. बदामामध्ये कॅल्शियम, व्हिटामिनई, बी६, थायमिन, फोलेट आणि पेन्टोथेनिक अॅसिड पुरेशा प्रमाणात असते. यात मँगनीज, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न, फॉस्फरस, झिंक आणि पोटॅशियमसारखी तत्वे आढळतात. हे खाल्ल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते.



अक्रोड की बदाम?


मेंदूबाबत बोलायचे झाल्यास तसेच निरोगी राहण्यासाठी तज्ञांच्या मते अक्रोड आणि बदाम दोन्ही फायदेशीर आहेत. बदाम त्या लोकांसाठी अधिक फायदेशीर आहे ज्यांना वजन कमी करायचे आहे. मेंदूसाठी अक्रोड थोडे जास्त फायदेशीर आहे. दररोज ४-५ बदामासह २ अक्रोड खाल्ल्याने शरीरास चांगले फायदे मिळतात.

Comments
Add Comment

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या