Almomds Vs walnuts: अक्रोड की बदाम? कोणते ड्रायफ्रुट आहे अधिक फायदेशीर

  79

मुंबई: ड्रायफ्रुट्स हा पोषणतत्वांचा खजाना मानला जातो. काजू, पिस्ता, बदाम, अक्रोड खाण्यासाठी जितके स्वादिष्ट असतात तितकेच फायदेशीरही असतात. अनेकदा म्हटले जाते की बदाम आणि अक्रोड खाल्ल्याने मेंदूची ताकद वाढते. दोन्ही सुकामेव्यामध्ये मानसिक आरोग्यासह शारिरीक विकासाला फायदेशीर ठरणारे घटक आहेत. दरम्यान, अनेकदा लोकांच्या मनात हा सवाल येतो की अक्रोड की बदाम यापेक्षा अधिक फायदेशीर काय आहे.



अक्रोडचे फायदे


हे ड्रायफ्रुट मेंदूच्या आकाराचे असते. हे खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली होती. यात कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, मँगनीज, कॉपर, मॅग्नेशियम सारखी पोषकतत्वे आहेत. यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. अस्थमा रोखणयासाठी, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच शरीरासाठी फायदेशीर असते.



बदामाचे फायदे


रात्री बदाम भिजत घालून सकाळी साले काढून खाल्ल्यास त्याचे शरीरास अनेक फायदे मिळतात. बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते. यात प्रोटीन, फॅट, व्हिटामिन आणि मिनरल्स आढळतात. यामुळे शरीराला आजारापासून दूर रोखता येते. बदामामध्ये कॅल्शियम, व्हिटामिनई, बी६, थायमिन, फोलेट आणि पेन्टोथेनिक अॅसिड पुरेशा प्रमाणात असते. यात मँगनीज, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न, फॉस्फरस, झिंक आणि पोटॅशियमसारखी तत्वे आढळतात. हे खाल्ल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते.



अक्रोड की बदाम?


मेंदूबाबत बोलायचे झाल्यास तसेच निरोगी राहण्यासाठी तज्ञांच्या मते अक्रोड आणि बदाम दोन्ही फायदेशीर आहेत. बदाम त्या लोकांसाठी अधिक फायदेशीर आहे ज्यांना वजन कमी करायचे आहे. मेंदूसाठी अक्रोड थोडे जास्त फायदेशीर आहे. दररोज ४-५ बदामासह २ अक्रोड खाल्ल्याने शरीरास चांगले फायदे मिळतात.

Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर