MLA disqualification : ठाकरे गटाच्या वकिलांवर भडकले सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश!

आमदार अपात्रता सुनावणीवेळी नेमकं काय घडलं?


नवी दिल्ली : शिवसेना (Shivsena) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या (NCP) फुटीनंतर कोणाचा पक्ष खरा यासोबतच आमदार अपात्रतेचा मुद्दा (MLA disqualification) निकालात येणं बाकी आहे. पक्ष सोडून जाणाऱ्या आमदारांबद्दल ठाकरे गट व शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने हा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला होता. नार्वेकरांनी शिवसेना व ठाकरे गट यांपैकी बहुमताच्या जोरावर खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचा निकाल देत कोणत्याही गटाचे आमदार अपात्र ठरवले नाहीत. राष्ट्रवादीच्या बाबतीतही त्यांनी असाच निकाल दिला. हा निकाल न पटल्याने तो पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या दरबारी गेला.


यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही प्रकरणांवर एकाच दिवशी सुनावणी करु, असं म्हटलं होतं. त्यानुसार आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टात नेमकं काय घडलं, याची माहिती ॲड. सिद्धार्थ शिंदे (Sidharth Shinde) यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की शिवसेनेची कागदपत्रं पूर्ण आहेत पुढील सुनावणी वेळी आम्ही थेट युक्तिवाद ऐकून घेऊ. त्यासाठीची तारीख आम्ही लवकरच देऊ.


यावेळी कोर्टरुममध्ये मुख्य न्यायाधीश चंद्रचूड ठाकरे गटाच्या एका वकिलांवर भडकले.ठाकरे गटाच्या वतीने एका वकिलाने कोर्टाला म्हटलं की, या प्रकरणाला विलंब होतो आहे. तुम्ही लवकरात लवकर तारीख द्या. त्यावर चंद्रचूड म्हणाले की, तुम्ही आमच्या इथे येऊन बसा आणि तुम्हीच ठरवा. आम्ही एक-दोन आठवड्यात तारीख देऊ.


दरम्यान, अजित पवारांसह त्यांच्यासोबत गेलेल्या ४१ आमदारांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली होती. याप्रकरणी अजित पवारांनी कोर्टाकडे वेळ वाढवून मागितला आहे. त्यांच्या विनंतीनुसार सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे.

Comments
Add Comment

ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या