Healthy: सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी प्या जिऱ्याचे पाणी, वितळू लागेल पोटाची चरबी

मुंबई: जिरे हा पदार्थ भारतीय मसाल्यातील महत्त्वाचा पदार्थ आहे. प्रत्येक भारतीय किचनमध्ये जिर आढळते. जिरे पदार्थात घातल्याने पदार्थाचा स्वाद वाढतो.


भाज्यांपासून ते पुलाव बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जिऱ्यापासून तुम्ही मॅजिकल ड्रिंक बनवू शकता. हे ड्रिंक तुम्हाला वेट लॉससाठी मदत करेल.


जिऱ्याचे पाणी एक हेल्दी ड्रिंक आहे जे सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने केवळ आपले शरीरच डिटॉक्सिफाय होत नाही तर वेट लॉसमध्येही फायदेशीर ठरते.


आज आम्ही तुम्हाला जिऱ्याच्या पाण्याचे काही फायदे सांगणार आहोत.


जिऱ्यामध्ये पॉलीफेनॉल्ससारखे अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. पॉलिफेनॉल्स अँटीऑक्सिडंट शरीराल डिटॉक्सिफाय करत इम्युनिटी बूस्ट करतात. यामुळे वेट लॉस होण्यास मदत होते.


एक चमचा जिऱ्यामध्ये केवळ ७ कॅलरीज असतात. अशातच हे जिरा वॉटर तुमच्यासाठी लो कॅलरी ऑप्शन ठरू शकते. याचे अनेक फायदेही आहेत.


जिऱ्याचे पाणी पाचनतंत्र स्वस्थ ठेवण्यास मदत करते. जिऱ्यामधील थायमोल गॅस्ट्रिक ग्लँड प्रोटीन, फॅट आणि शुगर तोडण्यास मदत करतात.


जिऱ्यामुळे मेटाबॉलिज्म वेगाने होते तसेच फॅट बर्निंगही वाढते. जिऱ्याचे पाणी पोटाची चरबी कमी करण्यास उपयुक्त ठरते. जर तुम्ही रेग्युलर एक्सरसाईजसोबत जिऱ्याचे पाणी घेतले तर बॉडी वेगाने कॅलरीज बर्न करण्यास मदत करते.

Comments
Add Comment

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल