Ganeshotsav Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदवार्ता! गणरायाच्या आगमनासाठी कोकणात धावणार आणखी रेल्वे

  85

मध्य रेल्वेचा निर्णय; 'या' तारखेपासून बुकिंग सुरू


मुंबई : गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2024) काही दिवस शिल्लक असताना अनेक ठिकाणी बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यातच लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी अनेक चाकरमानी कोकणात (Konkan) जातात. यासाठी गणेशोत्सवाच्या दोन-तीन महिन्याआधीच गाड्यांचे बुकिंग करण्यासाठी चाकरमान्यांची मोठी गर्दी होते. मात्र अनेकवेळ रांगेत उभे राहूनही अनेकांना आरक्षण मिळत नाही, यासाठी दरवर्षी मध्यरेल्वेकडून (Central Railway) विशेष गाड्या सोडण्यात येतात. यंदाही मध्य रेल्वेने २०२ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता आणखी काही रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, यंदा मध्य व पश्चिम रेल्वेने आणखी २० अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस-रत्नागिरी द्वी (०१०३१) साप्ताहिक विशेषच्या ८ फेऱ्यांचा समावेश असणार आहे. तर पनवेल-रत्नागिरी (०१४४३-०१४४४) साप्ताहिक विशेषच्या ४ फेऱ्या, पुणे - रत्नागिरी (०१४४७-०१४४८) साप्ताहिक विशेषच्या ४ फेऱ्या, पनवेल रत्नागिरी (०१४४१-०१४४२) साप्ताहिक विशेषच्या २ फेऱ्या आणि पुणे - रत्नागिरी (०१४४५) साप्ताहिक विशेषच्या २ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.


दरम्यान, या गणपती विशेष रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण उद्यापासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर विशेष शुल्कावर सुरू होईल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या