Mumbai water supply : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांतील एकूण पाणीसाठा ९० टक्क्यांवर!

मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटला; जाणून घ्या कोणत्या धरणात किती टक्के पाणी?


मुंबई : मुंबईत गेले काही दिवस सातत्याने पावसाच्या धारा (Mumbai rain) सुरु आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमधील एकूण पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. अशाच पद्धतीने पाऊस बरसत राहिला तर हा पाणीसाठा लवकरच १०० टक्के होईल. आनंदाची बातमी म्हणजे ७ जलाशयांपैकी ४ जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटला आहे.


मुंबई महानगरपालिकेने आज दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा ९० टक्के इतका झाला आहे. आज सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा १३,०२,६१९ दशलक्ष लीटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ९० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये ११,५७,९१९ दशलक्ष लिटर म्हणजेच ८० टक्के पाणीसाठा होता. तुलनेने यावर्षी तो १० टक्क्यांनी वाढला आहे.


मुंबई शहर आणि उपनगराला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ जलाशयांमधून पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये ५ धरणं आणि २ तलाव आहेत. या सातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामधील तुलसी, विहार, मोडक सागर आणि तानसा ही जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा केला जातो.



मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा -


अप्पर वैतरणा - ७५.७६ टक्के पाणीसाठा
मोडक सागर - १०० टक्के पाणीसाठा.
तानसा - ९९.३० टक्के पाणीसाठा.
मध्य वैतरणा - ९५.४१ टक्के पाणीसाठा.
भातसा - ८८.८७ टक्के पाणीसाठा.
विहार - १०० टक्के पाणीसाठा.
तुलसी - १०० टक्के पाणीसाठा.

Comments
Add Comment

Valvan Mahotsav 2026 : महिला बचत गटांच्या हाताची चव पोहोचणार थेट मुंबईकरांच्या घरापर्यंत

येत्या ११ आणि १२ मे २०२६ रोजी ‘वाळवण महोत्सव' मुंबई (विशेष प्रतिनिधी) महिला सक्षमीकरण आणि स्थानिक उत्पादनांना

Hutatma Smarak Chowk : हुतात्मा स्मारक चौकाच्या वास्तूची दुरवस्था, सुशोभीकरणाच्या मुद्दयावरून राजकारण करणाऱ्या काँग्रेसला भाजपने दाखवला आरसा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) हुतात्मा स्मारकाच्या (Hutatma Smarak Chowk) सुशोभिकरणाच्या मुद्दयावरून महापालिका सभागृहात चांगलीच

सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना दिला चेकमेट; प्राधान्य क्रम नाकारलेला प्रस्ताव बहुमताने केला मंजूर

वडाळ्यातील आझादनगर, कमलानगर पुनर्विकास प्रकल्पाला मिळणार गती मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेत वडाळा

SSC Result 2026 : महानगरपालिका माध्यमिक शाळांचा दहावीचा निकाल ९२.०८ टक्के

यंदा ७७ शाळांचा निकाल १०० टक्के; ६६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मुंबई (विशेष प्रतिनिधी) महाराष्ट्र

World Thalassemia Day : जागतिक थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून, महापौर आणि सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष यांनी केले रक्तदान

रक्त कमतरता (थॅलेसेमिया) ग्रस्त रुग्णांसाठी रक्तदानाबाबत जनजागृतीचा कृतिशील संदेश मुंबई (विशेष प्रतिनिधी

Thane- Mulund Railway Station : ठाणे-मुलुंड दरम्यान नवे रेल्वे स्थानक केंद्र सरकारची तत्त्वतः मान्यता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई : मुंबई आणि ठाणे या दोन शहरांमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांचा वाढता ताण लक्षात घेता, ठाणे आणि मुलुंड