BEST Bus : बेस्टमध्येही खोट्या प्रमाणपत्रांद्वारे घुसखोरी! ६० जणांचे कारनामे उघडकीस

चालक-वाहकाऐवजी सोयीने मिळवली कार्यालयीन कामे


मुंबई : खोटे अपंगत्व प्रमाणपत्र दाखवत तसेच आईवडिलांचंही नाव बदलत आयएएस पद मिळवलेल्या पूजा खेडकर सध्या प्रचंड चर्चेत आहेत. त्यांचे अनेक कारनामे उघडकीस आल्याने यूपीएससीने त्यांची उमेदवारी रद्द केली असून भविष्यातील कोणत्याही परीक्षा अथवा निवडींमधून त्यांना कायमचं काढून टाकलं आहे. हे प्रकरण ताजं असचतानाच आता बेस्टमधूनही असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेस्टमध्ये नोकरी मिळवताना खोटे अपंगत्व प्रमाणपत्र दाखवत ६० जणांनी चालक-वाहकाऐवजी सोयीने कार्यालयीन कामे मिळवल्याचा कारनामा उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोर्टाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांची चौकशी होत नसल्याचा आरोप केला जात आहे.


२०११ मध्ये एक व्यक्ती बेस्टमध्ये चालक म्हणून नोकरीला लागला. २०१६ मध्ये लकवा झाल्याचे सांगत ही व्यक्ती वैद्यकीय रजेवर गेली. वैद्यकीय रजा संपविण्यापूर्वी शासकीय वैद्यकीय मंडळाकडून अपंगत्व प्रमाणपत्र मिळवून कार्यालयीन काम मिळण्यासाठी त्यांनी बेस्टमध्ये अर्ज सादर केला. त्यांच्या अर्जाची फाइल बेस्टच्या डॉक्टरांनी मंजूरही केली. मात्र एका डॉक्टरला त्यांच्या प्रमाणपत्रावर संशय आल्याने पुनर्तपासणी करण्यात आली. त्यात या कर्मचाऱ्याने आरटीओतून लायसन्स रिन्यू केल्याचे निदर्शनास आले. पण त्यासाठी या कर्मचाऱ्याने आरटीओमध्ये स्वयंघोषित फिटनेस प्रमाणपत्रे सादर केली असल्याचे समोर आले.


अशाप्रकारे या कर्मचाऱ्याच्या बनावट प्रमाणपत्राचे पितळ उघडे पडले. या कर्मचाऱ्याप्रमाणे बेस्टमधील अनेक कर्मचाऱ्यांनी अशाचप्रकारे बनावट अपंगत्व प्रमाणपत्राद्वारे सोयीचे कार्यालयीन काम मिळवल्याची माहिती उघड झाली. या प्रकरणी बेस्ट प्रशासन मुंबई हायकोर्टात गेले असता कोर्टाने या प्रकरणाची तात्काळ चौकशीचे आदेश दिले. पण कोर्टाने आदेश देऊन ६ महिने झाले तरी देखील अद्याप चौकशी सुरू झाली नाही. त्यामुळे या बनावटगिरीचा भांडाफोड झाल्यास अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता

महापालिकेच्या चार रुग्णालयांची ऑक्सिजन लेव्हल वाढणार, कोविड काळातील त्या...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्यावतीने कोविड काळात निर्माण केलेल्या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन टाक्यांचा

कार्तिकी यात्रेसाठी जादा ११५० एसटी बस सोडणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी): बंदा क्षेत्र पंढरपूर येथे २ नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक

मुंबईत आता जलवाहिनी दुरुस्तीच्या काळात होणार नाही पाणीकपात, महापालिकेने असे घेतले हाती काम...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनींमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्तीच्या काळामध्ये

भारत सागरी सप्ताह २०२५ मध्ये ५५,९६९ कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार

भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सहकारातून समृद्धी आणणार: मंत्री अमित शाह

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत दोन मोठ्या नौकांचे सहकारी संस्थांना वितरण मुंबई : सहकाराच्या माध्यमातून