BEST Bus : बेस्टमध्येही खोट्या प्रमाणपत्रांद्वारे घुसखोरी! ६० जणांचे कारनामे उघडकीस

  108

चालक-वाहकाऐवजी सोयीने मिळवली कार्यालयीन कामे


मुंबई : खोटे अपंगत्व प्रमाणपत्र दाखवत तसेच आईवडिलांचंही नाव बदलत आयएएस पद मिळवलेल्या पूजा खेडकर सध्या प्रचंड चर्चेत आहेत. त्यांचे अनेक कारनामे उघडकीस आल्याने यूपीएससीने त्यांची उमेदवारी रद्द केली असून भविष्यातील कोणत्याही परीक्षा अथवा निवडींमधून त्यांना कायमचं काढून टाकलं आहे. हे प्रकरण ताजं असचतानाच आता बेस्टमधूनही असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेस्टमध्ये नोकरी मिळवताना खोटे अपंगत्व प्रमाणपत्र दाखवत ६० जणांनी चालक-वाहकाऐवजी सोयीने कार्यालयीन कामे मिळवल्याचा कारनामा उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोर्टाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांची चौकशी होत नसल्याचा आरोप केला जात आहे.


२०११ मध्ये एक व्यक्ती बेस्टमध्ये चालक म्हणून नोकरीला लागला. २०१६ मध्ये लकवा झाल्याचे सांगत ही व्यक्ती वैद्यकीय रजेवर गेली. वैद्यकीय रजा संपविण्यापूर्वी शासकीय वैद्यकीय मंडळाकडून अपंगत्व प्रमाणपत्र मिळवून कार्यालयीन काम मिळण्यासाठी त्यांनी बेस्टमध्ये अर्ज सादर केला. त्यांच्या अर्जाची फाइल बेस्टच्या डॉक्टरांनी मंजूरही केली. मात्र एका डॉक्टरला त्यांच्या प्रमाणपत्रावर संशय आल्याने पुनर्तपासणी करण्यात आली. त्यात या कर्मचाऱ्याने आरटीओतून लायसन्स रिन्यू केल्याचे निदर्शनास आले. पण त्यासाठी या कर्मचाऱ्याने आरटीओमध्ये स्वयंघोषित फिटनेस प्रमाणपत्रे सादर केली असल्याचे समोर आले.


अशाप्रकारे या कर्मचाऱ्याच्या बनावट प्रमाणपत्राचे पितळ उघडे पडले. या कर्मचाऱ्याप्रमाणे बेस्टमधील अनेक कर्मचाऱ्यांनी अशाचप्रकारे बनावट अपंगत्व प्रमाणपत्राद्वारे सोयीचे कार्यालयीन काम मिळवल्याची माहिती उघड झाली. या प्रकरणी बेस्ट प्रशासन मुंबई हायकोर्टात गेले असता कोर्टाने या प्रकरणाची तात्काळ चौकशीचे आदेश दिले. पण कोर्टाने आदेश देऊन ६ महिने झाले तरी देखील अद्याप चौकशी सुरू झाली नाही. त्यामुळे या बनावटगिरीचा भांडाफोड झाल्यास अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.