शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला दिला पाठिंबा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव नगरसेवक निवडून आला असून या नगरसेवकानेही आता शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. मालाडमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शप) अजित रावराणे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळाला अधिक बळ प्राप्त झाले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांचाही शिवसेनेला पाठिंबा असून यासाठी सहयोगी गट बनवून अधिकृत पाठिंब्याची प्रक्रिया सुरु आहे . त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांमध्येही ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .


मुंबई महापालिकेत भाजपचे ८९ आणि शिवसेनेचे २९ अशाप्रकारे ११८ असे निम्म्यापेक्षा अधिक संख्या होत आहे. तर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ०३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक अशाप्रकारे नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाच्या ३ नगरसेवकांचा पाठिंबा सहयोगी गटाच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्यावतीने सुरु आहे. याबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे . मात्र, याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही . त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होवून हा पाठिंबा मिळाला जाईल असे बोलले जात आहे.


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मालाडमधील एकमेव नगरसेवक असलेल्या अजित रावराणे यांनीही शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत आता नगरसेवक अजित रावराणे राहणार आहेत. याबाबत नगरसेवक अजित रावराणे यांनी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे . पण त्यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला नाही. मी शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असून एकमेव नगरसेवक असल्यामुळे मी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. . विभागात विकास कामे करण्यासाठी विकास निधीची गरज असते आणि याचे आश्वासन शिवसेनेने दिल्यामुळे मी त्यांना पाठिंबा दिल्याचे रावराणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र