हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या ढगफुटीत ५३ नागरिक बेपत्ता

सिमला : जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानुसार हिमाचल प्रदेशच्या कुलू, मंडी आणि सिमला येथे ढगफुटी झाल्याने आलेल्या पुरामुळे प्रचंड हानी झाली आहे. तेव्हापासून आजपर्यंत ५३ नागरिक बेपत्ता आहेत. बचावपथकाला सहा मृतदेह सापडले आहेत. पुरात साठपेक्षा अधिक घरे वाहून गेली आहेत. अनेक गावांना त्याचा फटका बसला आहे.


सिमला जिल्ह्यातील समेज भाग, रामपूर, कुलूतील बाघीपूल, मंडीचे पद्दार येथे ढगफुटी झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. रामपूर येथे दुरुस्तीचे काम सुरु आहे. पावसामुळे समेज आणि रामपूर भागाला जोडणाऱ्या रस्त्याची हानी झाली आहे. मंडीत सर्वाधिक पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर कुलूत एकाचा मृत्यू झाला आहे.


पावसाने बागीपूल येथील बांधकामस्थितीत असलेल्या कुरपान खाड पाणीपुरवठा योजनेची मोठी हानी झाली असून या योजनेसाठी ३१५ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी भेट देऊन त्याची माहिती घेतली. हिमाचलमध्ये सध्या लष्कर, पोलिस, एनडीआरएफ यांच्यासह विविध पथकांकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू या भागात सुमारे ५० जण मृत्युमुखी पडल्याची भीती राज्याचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील बचाव मोहीम पूर्ण झाल्यानंतर मृतांची अधिकृत आकडेवारी जाहीर केली जाईल, असे त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Iran Israel War : खामेनी यांच्या निधनावर भारताची श्रद्धांजली; परराष्ट्र सचिव यांनी दिली इराणी दूतावासाला भेट

भारत सरकारतर्फे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासाला भेट देऊन इराणचे दिवंगत

Sukhoi Su-30 MKI Crashes: भारतीय हवाई दलाचे सुखोई-३० लढाऊ विमान कोसळले; टेकऑफनंतर बेपत्ता, पायलटचे काय झाले?

मुंबई: भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता सुखोई-३० लढाऊ विमानाबाबत नवीन बातमी समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या