कडधान्यांची गोष्ट : कविता आणि काव्यकोडी

मोड आलेल्या कडधान्यांची
गोष्ट सांगते आई
कडधान्यांच्या उसळीबद्दल
सांगते बरंच काही

तोंडाला चव नसेल तर
म्हणते एक गोष्ट करावी
चमचमीत उसळीची चव
एकदा तरी घ्यावी

मोड आलेली कडधान्ये
पचायला असतात हलकी
चवीलासुद्धा मस्त म्हणे
आहारात हवीत नेमकी

वाल, हरभरा, मूग, मटकी
हुलगा, वाटाणा, मसूर
तूर, घेवडा, चवळी, उडीद
कडधान्ये आहेत भरपूर

मुबलक त्यात प्रोटिन्स
जीवनसत्त्वेही खूप
पचनक्रिया सुधारून
बाळसे धरते रूप

मोड आल्यावर त्यांना
ती आणखी उपयोगी होती
उत्तम तब्बेतीसाठी
आरोग्यदायी ती ठरती

आई नुसते बोलत नाही
साऱ्यांसाठी करते किती
कडधान्यांच्या केवढ्या
तिला येतात पाककृती

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) डोंगरावरील खडकातून
जन्माला आली
गुळगुळीत, सुंदर
काळी काळी झाली
श्रीगणेशा तिच्यावरच
काढला जाई
कोण बरं अ आ ई
गिरवून घेई?

२) शेतात राबतात
शेतकरी
तेव्हाच येतात ते
भूमीवरी

पिवळ्याधम्मक दाण्यांनी
खूप खूप हसतात
हिरव्या कपड्यात
दडून कोण बसतात?

३) इवलीशी साधीशी
तरी मोठी कामाची
अंधाराला पळवी
जरी असे मातीची

तेज नवे उधळण्याचे
सदा तिचे काम
आळसात बुडून कोण
करीत नाही आराम?

उत्तर -

१) पाटी
२) कणीस
३) पणती
Comments
Add Comment

जीवन एक शाळा

गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर जीवन ही केवळ जगण्याची प्रक्रिया नसून सतत शिकत राहण्याची एक अखंड शाळा आहे.

संमोहन

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ भूलशास्त्राचा (Anesthesia) शोध लागण्याच्या आधीची एक घटना आहे. ही एक ऐतिहासिक महत्त्वाची

फसवणूक

कथा : रमेश तांबे  दुपारची वेळ होती. मी ठाण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करीत होतो. गाडीत तुरळक गर्दी होती. गाडी

पृथ्वी सपाट का दिसते?

विज्ञानकथा : प्रा. देवबा पाटील  सहलीला गेले असताना शिवम त्याच्या मित्रांना माहिती सांगत होता. “आपल्या लाडक्या

मौलिक वेळ

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ सकाळी उठतो आणि आपण मोबाईल हातात देतो. सवयीप्रमाणे फेसबुक उघडतो आणि पहिलीच बातमी

लहरी राजा

कथा : रमेश तांबे  एक होता राजा. तो खूपच लहरी होता. मनाला वाटेल तसे आदेश द्यायचा आणि सैनिकांच्या बळावर जनतेला ते