IND vs SL: श्रीलंकेने भारताला ३ वर्षांनी हरवले, ३२ धावांनी मिळवला विजय

मुंबई: श्रीलंकेने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला ३२ धावांनी हरवले. टीम इंडियाला या मालिकेतील पहिल्या सामन्याप्रमाणे चांगली सुरूवात मिळाली मात्र मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्याने भारताला हा पराभव स्वीकारावा लागला.


श्रीलंकेच्या संघाने तब्बल ३ वर्षांनी एखाद्या वनडे सामन्यात भारताला हरवले. भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांबाबत बोलायचे झाल्यास शिवम दुबे आणि केएल राहुल शून्यावर बाद झाले तर श्रेयस अय्यरलाही दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. यजमान श्रीलंकेसाठी जॅफरी वँडरसन सगळ्यात प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने एकूण ६ विकेट मिळवले.


श्रीलंकेने पहिल्यांदा खेळताना २४० धावा केल्या होत्या. भारत आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरला तेव्हा रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शानदार सुरूवात करून दिली. दोघांमध्ये ९७ धावांची भागीदारी झाली आणि यातच कर्णधार रोहितने २९ बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहितने आपल्या खेळीदरम्यान ४४ बॉलमध्ये ६४ धावा केल्या. या दरम्यान त्याने ५ चौकार आणि ४ षटकार लगावले. दुसरीकडे गिलने ३५ धावांची भागीदारी केली. त्यांच्या ९७ धावांच्या भागीदारीनंतर एकामागोमाग एक विकेट पडू लागल्या.



५० धावांत गमावले ६ विकेट


भारतीय संघाने एका वेळेस विकेट न गमावता ९७ धावा केल्या होत्या मात्र रोहित शर्माची विकेट पडल्यानंतर फलंदाज येत जात राहिले. कर्णधार बाद झाल्यानंतर काही वेळात गिलही बाद झाला. दुबे चार बॉलवर एकही धाव न करता बाद झाला. विराट कोहली १४ धावा करू शकला. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल अनुक्रमे ७ आणि शून्यावर बाद झाले. या पद्धतीने भारताने विकेट न गमावता ९७ धावांवरून ६ बाद १४७ हा स्कोर केला. ५० धावांच्या आत ६ विकेट गमावल्याने टीम इंडिया संकटात आली. अक्षर पटेलने ४४ धावांची खेळी केली. मात्र तो अधिक काळ भारताचा पराभव टाळू शकला नाही.



३२ वर्षांनी मिळवला विजय


श्रीलंकेने एखाद्या वनडे सामन्यात भारतावर शेवटचा विजय जुलै २०२१मध्ये मिळवला होता. श्रीलंकेने त्यावेळेस टीम इंडियाला ३ विकेटनी हरवले होते.

Comments
Add Comment

Smriti Mandhana : कौतुकास्पद! स्मृती मानधना पुन्हा ठरली आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल

आयसीसी क्रमवारीमध्ये भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना एकदिवसीय फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर

CSK New Jersey : चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीचे अनावरण

पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने म्हणजेच सीएसकेने आयपीएल २०२६ च्या आधी त्यांची नवीन जर्सीचे अनावरण केले

T20 World Cup 2026 Ind vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या विजयी खेळीनंतर संजू सॅमसन भावुक

टी-२० विश्वचषकामध्ये सुपर ८ च्या एका महत्त्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिजला पाच विकेट्सनी पराभूत करत भारताने

IND vs WI: एका ओव्हरमध्येच सगळंच बदललं; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कधी झाला?

मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा पाच विकेटने पराभव करत सेमी फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.

संजूची बॅट तळपली, टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली

कोलकाता : ईडन गार्डनवर झालेल्या सुपर आठ फेरीतल्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात भारत पाच विकेट राखून जिंकला.

बुमराहसमोर वेस्ट इंडिजचा हेटमायर हतबल

कोलकाता : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीत आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा निर्णायक सामना