Jalna Accident : जालन्यात बसची ट्रकला जोरधार धडक! अपघातात १७ जण जखमी

सिंदखेडराजाहून नाशिकला जात होती बस


जालना : राज्यभरात अपघातांच्या घटनांमध्ये (Accident news) सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. त्यातच आता जालन्याच्याजवळ (Jalna Accident) असणाऱ्या सिंदखेड राजा चौकात मोठा अपघात झाला आहे. एका सायकलस्वाराला वाचवण्याच्या नादात बस आणि ट्रकचा विचित्र अपघात झाला. या अपघातात १७ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जालन्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यापासून जवळच असणाऱ्या सिंदखेडराजाहून नाशिकला जाणाऱ्या बससमोर सायकलचालक येत असल्याचे दिसताच बसचालकाने त्याला वाचवण्यासाठी जोरात ब्रेक दाबला. यामुळे बस उलटी फिरत मागे असणाऱ्या ट्रकला आदळली. या अपघातामुळे हादरा बसल्याने १७ जण जखमी झाले. यात वृद्धांसह महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.


या अपघातामुळे बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला असून खिडकीच्या काचाही फुटल्या आहेत. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सिंदखेड राजा चौकात झालेल्या अपघातानंतर बसमधील प्रवाशांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यानंतर जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरून बसला हलवण्यात आले.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Alert : ऑगस्टअखेर पावसाची सुट्टी? महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल; जाणून घ्या आजचं अपडेट

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल जाणवत असून, राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाल्याचे चित्र आहे.

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या