Jalna Accident : जालन्यात बसची ट्रकला जोरधार धडक! अपघातात १७ जण जखमी

सिंदखेडराजाहून नाशिकला जात होती बस


जालना : राज्यभरात अपघातांच्या घटनांमध्ये (Accident news) सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. त्यातच आता जालन्याच्याजवळ (Jalna Accident) असणाऱ्या सिंदखेड राजा चौकात मोठा अपघात झाला आहे. एका सायकलस्वाराला वाचवण्याच्या नादात बस आणि ट्रकचा विचित्र अपघात झाला. या अपघातात १७ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जालन्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यापासून जवळच असणाऱ्या सिंदखेडराजाहून नाशिकला जाणाऱ्या बससमोर सायकलचालक येत असल्याचे दिसताच बसचालकाने त्याला वाचवण्यासाठी जोरात ब्रेक दाबला. यामुळे बस उलटी फिरत मागे असणाऱ्या ट्रकला आदळली. या अपघातामुळे हादरा बसल्याने १७ जण जखमी झाले. यात वृद्धांसह महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.


या अपघातामुळे बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला असून खिडकीच्या काचाही फुटल्या आहेत. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सिंदखेड राजा चौकात झालेल्या अपघातानंतर बसमधील प्रवाशांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यानंतर जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरून बसला हलवण्यात आले.

Comments
Add Comment

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय

Beed Crime Govind Barge Death : प्रेम, पैसा आणि लॉज कनेक्शन…गोविंद बर्गेप्रकरणात नर्तकी पूजाचा नवा ट्विस्ट समोर

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यू

विदर्भातील स्पेशल ‘कच्चा चिवड्या’चा विश्वविक्रम

नागपूर : कच्चा चिवडा हा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटते. कच्चा चिवडा ही विदर्भामधील एक झटपट बनणारी

मुसळधार पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यात हजारो हेक्टर शेती गेली वाहून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सह संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यातील

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला