Jalna Accident : जालन्यात बसची ट्रकला जोरधार धडक! अपघातात १७ जण जखमी

  65

सिंदखेडराजाहून नाशिकला जात होती बस


जालना : राज्यभरात अपघातांच्या घटनांमध्ये (Accident news) सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. त्यातच आता जालन्याच्याजवळ (Jalna Accident) असणाऱ्या सिंदखेड राजा चौकात मोठा अपघात झाला आहे. एका सायकलस्वाराला वाचवण्याच्या नादात बस आणि ट्रकचा विचित्र अपघात झाला. या अपघातात १७ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जालन्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यापासून जवळच असणाऱ्या सिंदखेडराजाहून नाशिकला जाणाऱ्या बससमोर सायकलचालक येत असल्याचे दिसताच बसचालकाने त्याला वाचवण्यासाठी जोरात ब्रेक दाबला. यामुळे बस उलटी फिरत मागे असणाऱ्या ट्रकला आदळली. या अपघातामुळे हादरा बसल्याने १७ जण जखमी झाले. यात वृद्धांसह महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.


या अपघातामुळे बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला असून खिडकीच्या काचाही फुटल्या आहेत. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सिंदखेड राजा चौकात झालेल्या अपघातानंतर बसमधील प्रवाशांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यानंतर जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरून बसला हलवण्यात आले.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या