मुंबई : देशभरात सातत्याने छोटे मोठे अपघात घडत असतात. त्यातच सध्या पावसाळ्यात रस्ते अपघात (Road Accident) होण्याची शक्यता जास्त असते. मात्र अनेकदा अपघातामध्ये वेळीच उपचार व मदत न मिळाल्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत जाते. हे प्रकरण लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार (Central Government) अपघातग्रस्त पीडितांच्या मदतीसाठी सज्ज झाले असून एक योजना सुरु केली आहे. त्या योजनेदरम्यान पीडितांना उपचारादरम्यान कॅशलेस ट्रीटमेंट (Cashless Treatment Plan) देण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना याबद्दल माहिती दिली. केंद्र सरकारने रस्ते अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पॉलिसी तयार केली आहे. ‘पायलट प्रोजेक्ट’ (Pilot Project) असे या पॉलिसीचे नाव असून याद्वारे अपघातग्रस्तांना, जखमी झालेल्या प्रवाशांना कॅशलेस ट्रीटमेंट देण्याचा प्लान तयार करण्यात आला आहे. तसेच सर्वप्रथम या पायलट प्रोजेक्टचं चंदीगढ आणि आसाममध्ये ट्रायल सुरु करण्यात येणार आहे, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले.
या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांवर भारत पंतप्रधान जन आरोग्य अंतर्गत लिस्टेड रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहे. तसेच अपघात झाल्याच्या तारखेपासून पुढे सात दिवसांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत ट्रॉमा आणि पॉलीट्रॉमा केयरसंबंधी आरोग्य लाभाचे पॅकेज दिले जाणार आहेत.
ही योजना आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयअंतर्गत एनएचए, स्थानिक पोलीस, लिस्टेड रुग्णालय, राज्य आरोग्य एजन्सी, राष्ट्रीय सूचना विज्ञान केद्र आणि सामान्य विमा परिषदेच्या समन्वयाने पार पडणार आहे. तसेच याबाबत उत्पन्नाचे मार्ग आणि त्यावरील उपाय हे केंद्रीय मोटर वाहन नियम २०२२ अंतर्गत देण्यात आले आहेत.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…