Nitin Gadkari : रस्ते अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने सुरु केले 'पायलट प्रोजेक्ट'!

नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा; नेमकी काय आहे ही योजना?


मुंबई : देशभरात सातत्याने छोटे मोठे अपघात घडत असतात. त्यातच सध्या पावसाळ्यात रस्ते अपघात (Road Accident) होण्याची शक्यता जास्त असते. मात्र अनेकदा अपघातामध्ये वेळीच उपचार व मदत न मिळाल्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत जाते. हे प्रकरण लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार (Central Government) अपघातग्रस्त पीडितांच्या मदतीसाठी सज्ज झाले असून एक योजना सुरु केली आहे. त्या योजनेदरम्यान पीडितांना उपचारादरम्यान कॅशलेस ट्रीटमेंट (Cashless Treatment Plan) देण्यात येणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना याबद्दल माहिती दिली. केंद्र सरकारने रस्ते अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पॉलिसी तयार केली आहे. 'पायलट प्रोजेक्ट' (Pilot Project) असे या पॉलिसीचे नाव असून याद्वारे अपघातग्रस्तांना, जखमी झालेल्या प्रवाशांना कॅशलेस ट्रीटमेंट देण्याचा प्लान तयार करण्यात आला आहे. तसेच सर्वप्रथम या पायलट प्रोजेक्टचं चंदीगढ आणि आसाममध्ये ट्रायल सुरु करण्यात येणार आहे, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले.



काय आहे योजनेचा फायदा?


या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांवर भारत पंतप्रधान जन आरोग्य अंतर्गत लिस्टेड रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहे. तसेच अपघात झाल्याच्या तारखेपासून पुढे सात दिवसांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत ट्रॉमा आणि पॉलीट्रॉमा केयरसंबंधी आरोग्य लाभाचे पॅकेज दिले जाणार आहेत.



यांच्या समन्वयाने पार पडणार योजना


ही योजना आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयअंतर्गत एनएचए, स्थानिक पोलीस, लिस्टेड रुग्णालय, राज्य आरोग्य एजन्सी, राष्ट्रीय सूचना विज्ञान केद्र आणि सामान्य विमा परिषदेच्या समन्वयाने पार पडणार आहे. तसेच याबाबत उत्पन्नाचे मार्ग आणि त्यावरील उपाय हे केंद्रीय मोटर वाहन नियम २०२२ अंतर्गत देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या